शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपन्यांचा वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा

By admin | Updated: March 10, 2016 00:29 IST

तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक आहे. संत्रा उत्पादकही मोठया संख्येने आहेत. यामुळेच शेकडो बँकांनी तालुक्यात बस्तान मांडले. कर्जपुरवठ्यावरच बँकांची भिस्त आहे.

वरुड तालुक्यात दुष्काळ : कर्जबाजारी शेतकऱ्यांना कोण देणार न्याय?वरूड : तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक आहे. संत्रा उत्पादकही मोठया संख्येने आहेत. यामुळेच शेकडो बँकांनी तालुक्यात बस्तान मांडले. कर्जपुरवठ्यावरच बँकांची भिस्त आहे. शहरातील कर्जदाराला कर्ज वाटपानंतर आता उत्पन्नाच्या दृष्टीने ग्रामीण भागात सुध्दा खासगी फायनान्स कंपन्यांनी पाय रोवले आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देऊन नंतर या कंपन्या वसुलीसाठी सतत तगादा लावत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. खासगी फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गट आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. वसुलीसाठी गुंडांची मदत देखील घेतली जाते. रात्री-बेरात्री कर्जवसुलीसाठी पाठवून कर्जदारांची मानहानी करण्याचे प्रकार घडत आहे. या धास्तीपायी अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या असताना प्रशासन मात्र फायनान्स कंपन्याविरुध्द ‘ब्र’ सुध्दा बोलण्यास तयार नाही. कर्जवसुलीच्या तगाद्यामुळेच आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.तालुका आर्थिकदृष्ट्या सधन असला तरी शेतकरी-शेतमजुरांवर निसर्ग कोपल्याने सततची नापिकी जिवघेणी ठरत आहे. नेमका याचा फायदा घेत तालुक्यात शेकडो बँकांनी बस्तान मांडले. यामध्ये राष्ट्रीयीकृत, सहकारी तसेच खासगी बँकांचा समावेश आहे. घरबांधणीच्या नावावर शेकडो लोकांना खासगी कंपन्यांनी कर्जवाटप केले. परंतु सततची दुष्काळी परिस्थिती पाहता कर्जदाराकडून कर्ज भरणे शक्य होत नाही. तेव्हा खासगी फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी दंडुकेशाहीचा वापर सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला बचत गट, शेतकरी, शेतमजुरांना १० हजार रुपयांपासून तर चार ते पाच लाखांपर्यंत कर्जपुरवठा या खासगी फायनान्स कंपन्यांनी केला. या कंपन्यांकडून मायक्रो फायनान्स अशी नवी शक्कल लढवून बचत गटाच्या माध्यमातून १० हजार ते २० हजारांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. यावर १८ ते २० टक्के व्याज आकारणीमुळे मजुरांचे आर्थिक शोषण सुध्दा होत आहे. मुद्दलापेक्षा व्याजाची रक्कम अधिक होत गेल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. परंतु फायनान्स कंपन्यांचे वसुली अधिकारी धमक्या देऊन वसुलीचा तगादा लावत आहेत. हा प्र्रकार तालुक्यातील गावागावांत सुरु आहे. मागील वर्षी मार्चर् महिन्यात ढोक नावाच्या शेतकऱ्याने एका फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे जीवनयात्रा संपविली होती.मागील आठवडयात एका शेतकऱ्याने फायनान्स कंपन्यांच्या तगाद्यामुळे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु संबंधित फायनान्स कंपनीवर कुठलीही कारवाई झाली नाही. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. खासगी फायनान्स कंपनीच्या दंडूकेशाहीविरुध्द ठोस कारवाईची गरज आहे.अडल्या-नडल्या शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या खासगी फायनान्स कंपन्या नंतर मात्र अतिशय जाचक पध्दतीने वसुली करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. या फायनान्स कंपन्यांवर कुणाचा तरी वचक हवा, याबाबत प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)