शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीच्या पैशांसाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: March 13, 2015 00:15 IST

परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत.

सावरखेड : परिसरातील शेतकऱ्यांना नापिकीचा मोबदला मिळाला नाही. शेकडो शेतकरी नापिकीच्या लाभापासून वंचित राहिलेत. शेतकऱ्यांचा बँकेचे चुकीचे खाते क्रमांक महसूल प्रशासनाकडून पाठविल्यामुळे त्यांचे पैसे तीन वेळा परत गेले. ही चूक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना त्वरित लाभाची रक्कम मिळावी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण शासनाकडून केला जावा अन्यथा तहसीलवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे. सन २०१२-१३मध्ये नापिकीची स्थिती होती. त्यावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. शासनाकडून केलेल्या सर्वेक्षणानुसार नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची यादी बनविण्यात आली. शेतकऱ्यांचे बँक खाते क्र. संबंधित तलाठ्यांकडे देण्यास सांगितले. तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या यादीसह बँक खाते क्रमांक तहसील कार्यालय मोर्शी येथे सादर केली. काही शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या करुन तहसील कार्यालयाकडून बँकेकडे पाठविण्यात आल्या. या यादीमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे बँकेचे खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने पाठविण्यात आल्याने त्यांचे पैसे खात्यात जमा न होता परत गेले, अशी चर्चा आहे. ही चूक सुधारावी व शासनाने देऊ केलेली रक्कम आपल्या खात्यात जमा व्हावी, यासाठी संबंधित शेतकरी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवित आहेत.५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांकात बदल दिसून आला. दुरुस्तीकरिता पुन्हा खाते क्रमांक मागविण्यात आले. पुन्हा तोच घोळ झाल्याने नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले. त्यांना लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरु केली आहे. एक वर्षापासून शेतकरी तहसीलकडे तक्रारी व चकरा मारीत आहेत. परिसरातील नेरपिंगळाई, कमळापूर, राजूरवाडी, सिरलस, लिहिदा या भागातील शेतकऱ्यांना याचा चांगला फटका बसला आहे. नेरपिंगळाई भाग १ व भाग २ मधील शेतकऱ्यांचा सर्वाधिक घोळ झाला. याचे तीन वेळा पैसे परत गेल्याची माहिती आहे. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी कंटाळले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत आहे. एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे कामाचा भार येत असल्याने हा घोळ आपल्या कारकिर्दीत झाला नाही. म्हणून दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. झालेल्या घोळाला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारित आहे. सिरलस, राजुरवाडी, कमळापूर, नेरपिंगळाई, लिहिदा येथील शेतकऱ्यांना झळ बसली आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करण्याचे शेतकऱ्यांनी निर्णय गेतला आहे. भाजपा नेरपिंगळाई शाखाध्यक्ष अनिल फंदे यांच्या सह शेकडो शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला संबंधित प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे हा इशारा दिला असून या निवेदनात ४५ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.