शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2014 23:52 IST

खंडीत पावसामुळे जिल्ह्यातील पीक पेरणी दीड महिना रखडल्या होत्या नंतर अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै रोजी

गजानन मोहोड - अमरावतीखंडीत पावसामुळे जिल्ह्यातील पीक पेरणी दीड महिना रखडल्या होत्या नंतर अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपुष्टात आली. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या योजनेला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्येही केंद्र शासनाने मेख मारली आहे. केवळ आॅगस्ट महिन्यामध्ये पीक पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे. परिणामी जिल्ह्यात ८० टक्के पेरणी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्यामुळे मुदतवाढ ही फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेती पिकांना ६० ते ८० टक्के जोखमीस्तर व पिकानुरूप दर हेक्टरी १३ हजार ते ३ लाख ४२ हजार रूपयापर्यंत पीक विम्याचे संरक्षण कवच लाभणार या अपेक्षेत शेतकरी असताना या योजनीच मुदत ३० जुलै संपली. योजनेला केवळ ७ दिवसांचा कालावधी लाभला हे वृत्त लोकमतने दि. ३१ जुलैच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याच दिवसी सायंकाळी या योजनेला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शासनाने अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सर्व पिकाकरिता विमा हप्त्यात ५० टक्के व कापूस पिकाकरीता ७५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. तसेच कमाल भुधारक शेतकऱ्यांकरिता कापूस पिकासाठी ५० टक्के सूट देण्यात आली आहे.