शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: May 22, 2015 00:42 IST

दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते, वाहनांची वाढती संख्या, शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी

सुनीश देशपांडे अचलपूरदुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते, वाहनांची वाढती संख्या, शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात नगरपालिका शुक्रवार २२ मे पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहे. ही मोहीम तीन दिवस चालणार असून यामध्ये तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, नझूल अधिकारी सहभागी होणार आहेत. यामुळे रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार आहे. येथील मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने मूळ रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यात बांधलेल्या खासगी कॉम्प्लेक्सला पार्किंग झोन नसल्याने लोक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन लहानमोठे अपघात होतात. अचलपूर नगरपालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. पण पुन्हा तेथे अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता न घेतल्याने काही दिवसात ‘जैसे थे’ ची परिस्थिती निर्माण झाली. अनेकदा अतिक्रमण हटवू नये म्हणून नगरसेवकांचा दबाव येत असे, असे संबंधित अधिकारी सांगत असत. मागील १५ दिवसांपूर्वी आलेले अचलपूर नवनियुक्त प्रशिक्षणार्थी, उपविभागीय अधिकारी शनमुगम राजन यांच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्यापूर्वी अतिक्रमितांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. तसेच नोटीसही देण्यात आली. अतिक्रमितांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण हटवावे, अन्यथा नगरपालिका बुलडोजरने ते अतिक्रमण काढतील. यात नुकसान झाल्यास अतिक्रमणधारक जबाबदार राहतील, अशाही सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. काही अतिक्रमित दुकानदार रस्त्यापर्यंत आपला विक्रीचा माल ठेवत असल्याने लहानमोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. त्यांचे प्रथम अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अचानक भेट देऊन कुणी दुकानाबाहेर माल आणून ठेवलेला असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली.