शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती,१३४ तालुक्यांमध्ये भूजल निर्देशांक माघारला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 10:27 PM

राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे.

 - गजानन मोहोड 

अमरावती  - राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे. भुजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षण विहिरीच्या नोंदीची यापूर्वीच्या १० वर्षांच्या भूजलपातळीशी तुलना केली असता हे निरीक्षण नोंदविण्यात आले. यामध्ये सात तालुक्यात अतीगंभीर, ४२ तालुक्यात गंभीर तर  स्वरूपाचा तर ८५ तालुक्यात मध्यम स्वरुपात भुजलात कमी आलेली आहे.नव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रिय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते. अनिवार्य निर्देशांकामुळे २०१ तालुक्यांत दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागल्यानंतर या सर्व तालुक्यात मृदु आर्द्रता निर्देशांकानुसार दुष्काळाची क्रमवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतरच्या जलविषयक निर्देशांकांमध्ये राज्यातील सर्व जलसाठ्या संदर्भात पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे मुल्यमापन करण्यासाठी भूजल पातळी निर्देशांकाचा वापर करण्यात आला. त्यानुुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये हा धक्कादायक नित्कर्ष नोंदविण्यात आला. या ठिकाणी आता चाºयाची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची वाढती मागणी व रोजगारासाठी लोकांचे स्थलांतर आदी विषयक माहिती सबंधित जिल्ह्यांकडून मागविण्यात येणार आहे

भूजल पातळी निर्देशांकानुसार बाधित तालुकेराज्यात ३५१ तालुक्यापैकी २१७ तालुक्यात स्थिती सामान्य आहे. मात्र, १३४ तालुक्यातील भुजलस्तर कमी झालेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके, अकोला २, अमरावती ३, औरंगाबाद ३, बीड ८, बुलडाणा ९, चंद्रपूर ४, धुळे १, जळगाव ३ जालना ४, लातूर ४, नागपूर ६, नांदेड ३, नंदूरबार ४, नाशिक ७, उसमानाबाद ८, परभनी २, पुणे ७, रायगड ११, रत्नागिरी ३, सांगली ७, सातार २, सिंधुदूर्ग १, सोलापूर ११, ठाणे/पालघर १३, वर्धा १व यवतमाळ जिल्ह्यातील १ तालुका भूजल पातळी निर्देशांकात माघारला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र