शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने खरिपावर रोगांचे संकट !

By admin | Updated: May 16, 2015 00:47 IST

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत.

तीन वर्षांची स्थिती : रबी हंगामानंतर जमीन तापत नसल्याने विपरीत परिणामगजानन मोहोड अमरावतीगेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत. मशागतीनंतर किमान दोन महिने जमीन पुरेशी तापायला हवी. परंतु अवकाळी पावसामुळे जमीन तापण्यास पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी मातीचा पोत खराब होत आहे. यामुळे किडी, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होऊ शकतो, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे २०१३ च्या मे अखेर ७६ मि.मी., २०१४ च्या मे अखेर १७० मि.मी. व यंदा १३ मेपर्यंत ९८ मि.मी. अवकाळी पाऊस पडला. यामुळे गहू, हरभरा व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम निसर्गासह, शेतजमिन, पशुपक्षी व मानवी जीवनावर होत आहे. निसर्ग नियमानुसार वर्षाचे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा असे तीन ऋतू आहेत. परंतु निसर्गाचे चक्रच सध्या बदलेले आहे. मे महिन्यांपर्यंत अवकाळीचे थैमान असते तर जून महिन्यात पेरणीच्या काळात दोन महिने पावसाचा पत्ताच नसतो. पावसाळ्यात उन्हाची तीव्रता जाणवते तर उन्हाळ्यात पावसाळ्याचा भास होतो. यामुळे पिकांचीही शाश्वती नाही. अवकाळी पाऊस मान्सूनसाठी बाधक उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस हा मोसमी वाऱ्यांसाठीही बाधक ठरणारा आहे. तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परंतु कमी-अधिक तापमान राहिल्यास त्याचा परिणाम पुढे सरकणाऱ्या प्रक्रियेवर होत असतो. इशान्य-नैर्ऋत्य पाऊस खेचण्यासाठी पोषक वातावरण लागते. अवकाळीने जमीन तापत नाही तसेच बाष्पीभवनही कमी प्रमाणात होते. त्यामुळे पाऊस लांबणीवर जातो. पावसाचे उशिरा होणारे आगमन ही त्याचीच प्रतिक्रिया असते. यालाच ऋतुमान बदल असेही आपण म्हणू शकतो. हा बदल अहितकारी आहे, अशी माहिती कृषितज्ज्ञांनी दिली. जमिनीच्या आरोग्यावर परिणामएप्रिलमध्ये शेतीची मशागत होऊन मे अखेरपर्यंत ती तापायला हवी. यामुळे जमिनीत असलेले सुप्तावस्थेतील कीटक बाहेर पडून नष्ट होतात. परंतु अवकाळीमुळे त्यांना अनुकूल परिस्थिती लाभत आहे. त्यामुळे पिकांवर बुरशी, अळयांचा प्रादुर्भाव वाढतो. वैशाखातील ऊन जमिनीला मिळणे आवश्यक आहे. परंतु गेल्या ३ वर्षांपासून एप्रिल व मे महिन्यांत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट असल्याने जमीन तापत नाही. त्यामुळे कीड नष्ट होत नाही. याचा जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.जमिनीलाही हवी विश्रांतीजमिनीच्या विश्रांतीचा काळ हा मार्च ते मे अखेरपर्यंत असतो. या काळात जमिनीचे तापमान वाढलेले असते. यामध्ये जर अवकाळी पाऊस पडला तर मातीमधील वेगवेगळ्या प्रकारचे अंडीकुंज नष्ट होत नाहीत. त्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. जमीन मशागतीला पुरेसा अवधी मिळत नाही. जमीन थंड-गरम होत राहिल्याने जमिनीचा पोत खराब होतो.