शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

३८ कोटींच्या आराखड्यातील विकासकामे प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:00 AM

वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने येथील मूलभूत सुविधांकरिता ३८ कोटींचा आराखडा मंजूर करून तातडीने निधीसुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळेच या परिसाराचा कायपालट होत

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : संत गाडगेबाबांच्या निर्वाणभूमीमुळे भाविकांना सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पेढी नदीवरील निर्वाणस्थळाचा ३८ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्यातून कायापालट करण्यात येत आहे. तेथे अनेक विकासकामे प्रगतिपथावर आहेत. मूलभूत सुविधा निर्माण झाल्याने भाविक व पर्यटकांची पावले निर्वाणभूमीकडे वळली आहेत असा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने येथील मूलभूत सुविधांकरिता ३८ कोटींचा आराखडा मंजूर करून तातडीने निधीसुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळेच या परिसाराचा कायपालट होत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. निर्वाणस्थळाचा विकास, बसस्थानक, अंतर्गत रस्ते, घाटाचे बांधकाम, पूरप्रतिबंधक भिंत, उद्यान, वृद्धाश्रमातील खोल्यांची दुरुस्ती, भक्तनिवास, ध्यान केंद्र, पाणी योजना, स्मशानभूमी बांधकाम आदी विकासकामांचा त्यात समावेश आहे. सद्यस्थितीत काही विकासकामे पूर्ण झाली असून, उर्वरित प्रगतिपथावर आहेत. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पवित्र निर्वाणस्थळी त्यांच्या भक्त तथा अनुयायांची गैरसोय होत होती. त्यामुळेच हा विषय सातत्याने लावून धरल्यामुळे आता संत गाडगेबाबांच्या निर्वाणभूमीचा चेहरामोहरा बदललेला असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या.बसस्थानकाची प्रशस्त इमारत होणारअमरावती ते परतवाडा मार्गातील वलगाव येथून चौरस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. प्रवाशांचीही संख्या मोठी राहते. मात्र, बस स्थानकात अपुरी जागा व तोकड्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे या बसस्थानकाचा विकास आराखड्यात समावेश करून घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच बस स्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करवून घेतले. आता लवकरच बसस्थानकाची ही प्रशस्त इमारत उभी राहणार असून, त्याचा लाभ असंख्य प्रवाशांना होणार आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास