अभ्यासक्रम अपूर्ण, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:57+5:30

कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. 

Curriculum incomplete, increased anxiety of 10th-12th grade students | अभ्यासक्रम अपूर्ण, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिंता

अभ्यासक्रम अपूर्ण, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिंता

Next
ठळक मुद्देपालकांकडून २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी, परीक्षेचे स्वरूप स्पष्ट व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या कमी कालावधी यामुळे यंदा दहावी, बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सत्रांत परीक्षेचा ताण  वाढला आहे. 
करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. 
कोरोना संसर्गाने उडविलेल्या गोंधळामुळे शासनाने आधीच २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असल्याचे विविध शाळांच्या शिक्षकांकडून मिळालेली माहिती आहे. ऑनलाईन शिक्षणालाही मर्यादा आहेत. किती मुले, किती वेळ सलग जॉईन होऊ शकतील, हाही प्रश्न आहे. दररोज विषय घेणे अवघड असल्याने दिवसाआड होणारे विषयाचे वर्ग,  उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम  पूर्ण करण्यात असलेली वेळेची अडचण या  नव्या समस्या उद्भवल्या आहेत. 

संभ्रम दूर व्हावा
शासनाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या स्वरुपाबाबत संभ्रम आहे. वर्णनात्मक की एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थिहित लक्षात घेऊन ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी.
- राजकन्या चवरे, पालक.

विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच नाही. यामुळे परीक्षेची मांडणी सुटसुटीत करावी. तामिळनाडूप्रमाणे शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा विचार करावा.
- प्रकाश पाटील, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गातील प्रत्यक्ष संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यातील प्रश्नांची संख्या वाढवावी.
- चुटकी रोकडे, दहावी

 

Web Title: Curriculum incomplete, increased anxiety of 10th-12th grade students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.