शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई महामार्ग बाधितांचे कल्पक पुनर्वसन

By admin | Updated: June 1, 2016 00:44 IST

अमरावती, औरंगाबाद या महसुली मुख्यालयाबरोबरच नागपूरला राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई -नागपूर द्रुतगती ...

प्रक्रिया सुरू : आर्थिक मोबदल्याऐवजी मोक्याचा भूखंडजितेंद्र दखने अमरावतीअमरावती, औरंगाबाद या महसुली मुख्यालयाबरोबरच नागपूरला राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई -नागपूर द्रुतगती महामार्गासाठी लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या महामार्गामुळे बाधित लोकसंख्येचे कल्पक पुनर्वसन केले जाणार आहे. महामार्ग बाधिताना रोख रकमेऐवजी शहरा शेजारी मोठा भूखंड देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा मुंबई-नागपूर हा ८५० किलोमीटरचा महामार्ग ज्या गावांमधून जाईल अशा सर्व ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तब्बल ३० हजार कोटी रूपये खर्चून उभारला जाणारा हा महामार्ग सन २०१९ पर्यंत तयार होईल. या महामार्गावर आॅप्टीक फायबरचे जाळे असेल. औरंगाबाद-अमरावती या मार्गावरून पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे’ असे संबोधिले जाईल.जिल्ह्यातून ७० किमीचा मार्गअमरावती : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) राबविला जाणारा हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यात भूसंपादन आणि चौपदरीकरण होईल तर दुसऱ्या टप्प्यात सहा पदरी काँक्रीट रस्ता बांधला जाणार आहे. ‘कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे’ वरून मुंबई ते नागपूर हे अंतर दहा तासांत पार होईल. हा महामार्ग ज्या ठिकाणाहून जाणार आहे. अशा सर्व ठिकाणी केंद्रीय विद्यालय, पेट्रोलपंप, अंतर्गत रस्ते, आयटीआय महाविद्यालय, वित्तीय केंद्र, पर्यटन केंद्र, हॉटेल्स, मॉल्स, वेअर हाऊसिंग आणि लहान-मोठ्या उद्योगांची उभारणी होईल. त्याअनुशंगाने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहेजिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगांव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातून सुमारे ७० किलोमीटर अंतराचा हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. मात्र, प्रचलित पध्दतीने भूसंपादनाचा मोबदला न देता ग्रामीणांचे आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊन त्यांना महामार्ग आणि शहरानजीक व्यापक क्षेत्रफळाचा भूखंड दिला जाणार आहे. बाधित ग्रामस्थांना आर्थिक स्वरू पात देय मोबदल्यामध्ये कपात करून त्यांना शहराशेजारी व्यवसाय करता यावा, यासाठी रहिवासी अथवा व्यावसायिक भूखंड देण्याचे राज्यशासनाचे प्रयोजन आहे. याची सर्व अंमलबजावणी एमएसआरडीसीमार्फत केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)