शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

चिमुकला सुखरूप, किडनॅपर अहमदनगरचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण ...

ठळक मुद्देमहिलेसह पाच जणांना अटक, अहमदनगर-अमरावती पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण मार्गावरून ताबा घेतला. अपहृत मुलगा सुखरुप असल्याची माहिती अमरावतीत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अमरावती शहरात आनंद व्यक्त केला गेला. अहमदनगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि अमरावती पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींसह अपहृत चिमुकल्याला घेवून तपास पथक अहमदनगरहून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहे. शनिवारी सकाळी चिमुकला शहरात पोहोचेल. मुलाच्या अपहरणाने सैरभैर झालेल्या आई-वडिलांच्या नजरा त्याच्या वाटेकडे रोखल्या गेल्या आहेत.पोलीस सूत्रांनुसार, हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकीजवळ, कोठला, अहमदनगर), अलमास ताहीर शेख (१८, रा. कोठला, अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) या तिघांना  प्रथम अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले गेले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अपहृत मुलगा आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तपास पथकाने अहमदनगर शहरात शोध  सुरू केला. अपहरणकर्ते मुलाला घेऊन अहमदनगरहून कल्याणच्या दिशेने गेल्याची माहिती त्यांना मिळाली. मुलाला दुचाकीहून नेले जात असताना  ग्रामस्थांच्या मदतीने तपास पथकाने दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणातील सर्व आरोपी तरुण आहेत. ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावतीहून तपास पथक  बुधवारी रात्री अहमदनगर येथे रवाना करण्यात आले असताना अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला. अमरावती आणि अहमदनगर पोलिसांच्या संयुक्त आणि वेगवान कारवाईमुळे अपहृत मुलगा सुखरुपरित्या हाती लागला. या प्रकरणात आणखी कुणी मास्टरमाईंड आहे का? अपहरण करणारी ही टोळी यापूर्वीही अशा घटनांमध्ये लिप्त होती की कसे, याचा शोध अमरावती पोलीस घेणार आहेत. चिमुकल्याच्या अपहरणाने हळहळलेली अमरावती आता आनंद व्यक्त करीत आहे. 

आजीवर संशयाची सुईचिमुकल्याचे अपहरण झाले तेव्हा त्याच्यासोबत आजी होती. त्यामुळे गुरुवारी त्यांचे बयाण नोंदवून शुक्रवारी सकाळपासून कसून चौकशी केली. आरोपी हिनाला ती ओळखत असल्याचे तसेच तिचेही माहेर अहमदनगर असल्याचे पुढे आले. त्यामुळे अपहरणामध्ये आजीचा तर सहभाग नाही ना, यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत.

तीन बहिणींनाही आनंद पोलिसांनी पुतण्याचा शोध घेतल्याची माहिती पथकासोबत अहमदनगर येथे गेलेल्या काकांनी अमरावतीला फोन करून कुटुंबातील सदस्यांना दिली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुलाच्या सख्ख्या मोठ्या बहिणीचासुद्धा आनंद गगनात मावेनसा झाला. आपला भाऊ नेहमीप्रमाणे पुन्हा आपल्यासोबत खेळणार, हा आनंद त्याच्या बहिणींना होता. सदर मुलगा घरात व परिसरात सर्वांचा लाडका आहे. तो मिळाल्याने परिसरातील लोकांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे. 

मुलाच्या घरी नातेवाइकांची गर्दीशारदानगर येथील मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या घरी नातेवाइकांनी व आप्तस्वकियांनी गर्दी केली. बुधवारी रात्रीपासून तर शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्याकडे नातेवाईक तसेच राजकीय तथा विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. मुलगा सुखरूप असल्याची माहिती दुपारी पोलिसांनी कुटुंबीयांना दिल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर पुन्हा नातेवाइकांनी गर्दी केली.  काहींनी मुलगा सुखरूप असल्याबाबत समाधान व्यक्त केले, तर काहींनी पोलिसांचे आभार मानले. 

अहमदनगर शहरातून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यात अपहरण करणाऱ्या दोन आरोपींचाही समावेश आहे. खंडणीसाठी अपहरण केले असावे. त्या दिशेने तपास सुरू आहे. मुलाच्या आजीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.आरती सिंह, पोलीस आयुक्त

 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस