शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

By admin | Updated: November 10, 2014 22:37 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत.

आसरा (भातकुली): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत. शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन यापैकी कोणीही कायमस्वरूपी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. असे असूनही बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागही यास अपवाद नाही. अनेक ठिकाणी डॉक्टरच नेमून दिलेल्या रूग्णालयात राहात नसल्याने रूग्णांना हेलपाटे घ्यावे लागतात. शेवटी आर्थिक ताण सहन करून खासगी दवाखान्यांमधून उपचार करून घ्यावे लागतात. आसरा गावात तर हे चित्र अधिकच विदारकपणे समोर आले आहे. या गावात दोन तलाठी आहेत. परंतु हे तलाठी केवळ २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट या दोन दिवशीच गावकऱ्यांच्या दृष्टीस पडतात. इतर दिवशी यांचा पत्ता नसतो. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक महत्वाच्या कामांसाठी महिनोन्गणती प्रतीक्षा करावी लागते. या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांचे मात्र हाल होत आहेत. सद्यस्थितीत एक कोतवाल गावचा कारभार पाहात आहे. आसरा येथील ग्रामसेवकांना भातकुलीचा कार्यभारदेखील सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना भातकुलीत येणे-जाणे करावे लागते. परिणामी त्यांना आसरा गावातील समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आसार गाववासीयांच्या अडचणी रखडल्या आहेत. विद्युत कर्मचाऱ्यांचीही तीच गत आहे. आसरा येथे स्थायी स्वरूपात राहणारा एकही वीज कर्मचारी नाही. त्यामुळे ऐनवेळी, रात्री-बेरात्री विजेची समस्या उदभवल्यास नागरिकांना एक तर अंधारात रात्र काढावी लागते किंवा शहरात जाऊन लाईनमन आणावा लागतो. शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी कुणीही आसरा येथे कायमस्वरूपी राहात नसल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. समस्या नेमकी मांडावी तरी कुणापुढेय असा प्रश्न त्यांच्या समक्ष उपस्थित झाला आहे. आसरा गावात ग्रामपंचायत कार्यालयानजीकच्या एका खोलीत पोलीस चौकी, आसरा असा फलक बऱ्याच दिवसांपासून लागलेला आहे. परंतु याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आजवर ग्रामस्थांना आढळून आलेला नाही. या पोलीस चौकीला नेहमीच कुलूप असते. गावात आपातकालिन स्थिती उदभवल्यास बाहेरून कुमक येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष वाढीस लागला आहे. गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याबाबत कोणाकडे तक्रार करावी, अशा पेचात ग्रामवासी अडकले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सर्वच विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी.