शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धाचे सर्व १३ दरवाजे उघडले

By admin | Updated: August 6, 2015 01:23 IST

अप्पर वर्धा धरणाच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे ..

मोर्शी : अप्पर वर्धा धरणाच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे मंगळवार संध्याकाळनंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढल्यामुळे ५ आॅगस्टच्या सकाळी १० वाजता धरणाची संपूर्ण तेराही दारे उघडण्यात आली. धरणासमोरील पूलावरुन कित्येक फूट पाणी वाहात असल्यामुळे आष्टी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पावसाची झड लागली आहे. (सविस्तर वृत्त/३) बुधवारी सकाळी ८ वाजता पर्यंतच्या २४ तासात पाणलोट क्षेत्रातील महाराष्ट् आणि मध्य प्रदेश क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात १०० मिमीपेक्षा जास्त पाउस पडला. धरणाला येवून मिळणाऱ्या माडू, वर्धा आणि जाम नदीला पूर आल्यामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढीस लागला. अप्पर वर्धा धरणात ३१ आॅगस्टपर्यंत ३४२.२ मिटर जलपातळी ठेवण्याचे नियोजन आहे. मंगळवारी दुपारी ही पातळी ३३९.४३ मीटर एवढी होती. एकूणच आॅगस्ट महिन्याची निर्धारित जलपातळी गाठण्याकरिता फार दिवस वाट पाहावी लागेल, असे मंगळवारचे चित्र असताना मात्र ५ आॅगस्टला सकाळी ५१७७ घनमीटर प्रतिसेकंद एवढा पाणी साठा वाढला आणि धरणाची पातळी ३४१.६५ मीटर एवढी झाली. आॅगस्ट महिना संपण्यास अजून वेळ असल्यामुळे शिवाय उर्वरित दिवसात आणखी पाउस येण्याची शक्यता पाहता, अप्पर वर्धा धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९.३० पासून आष्टी मार्ग बंद करण्यात आला आणि त्या नंतर १० वाजता धरणाचे संपूर्ण १३ ही दारे ५० सेंमीने उघडण्यात आले. यावेळी १०१५ घनमीटर प्रतिसेकंद एवढा विसर्ग सुरु करण्यात आला. तथापि, पाण्याची पातळी वाढत असल्याचे पाहून सकाळी ११ वाजता १ मीटरने तर दुपारी १२ वाजता दीड मीटरने धरणाची दारे उघडण्यात आली. सध्या २८१७ घनमिटर प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सकाळी १० वाजता ५१७७ घनमीटर एवढा पाण्याचा येवा होता तो ११ वाजता ४५२७ आणि दूपारी १२ वाजता ४५२७ तर १ वाजता ३९७८ घनमीटर प्रतीसेकंद एवढा कमी होत गेला. सद्यस्थितीत तरी गुरुवारपर्यंत संपूर्ण तेराही दारे उघडी राहण्याची शक्यता आहे. धरणस्थळी अधीक्षक अभियंता र. प. लांडे, कार्यकारी अभियंता स. ना .लढ्ढा यांनी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेतली. उपविभागीय अभियंता एम. के. काळमेघ, शाखा अभियंता सुधाकर राउत, स्थापत्य अभियंता सहायक साने, यांत्रीकी विभागातील विजय मेश्राम आणि इतर कर्मचारी धरणस्थळी ठाण मांडून बसले आहे. (तालुका प्रतिनिधी)