शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतर प्रशासकांकडून कारभार सरपंचांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० पैकी मुदत संपलेल्या ५५२ ग्रामपंचायतींवर गत सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ...

अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० पैकी मुदत संपलेल्या ५५२ ग्रामपंचायतींवर गत सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास २१७ प्रशासक नेमले होते. या प्रशासकांनी जवळपास सहा महिने कारभार सांभाळल्यानंतर आता सरपंचांकडे ग्रामपंचायती सुपूर्द केल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे एप्रिल ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी गावातील ज्येष्ठ नागरिकांची नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागणार होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काहींनी न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने मात्र सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले. या प्रशासकांच्या हाती ग्रामपंचायतींचा कारभार असल्यामुळे राजकीय लुडबुड थांबली. परिणामी गावच्या पुढाऱ्यांचाही हिरमोड झाला. आता प्रशासकांकडील कारभार सरपंचाच्या हातात आला आहे. गावागावांतील विकासकामे हाताळण्याचा तसेच नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सरपंचाकडे दररोज ग्रामस्थ अडीअडचणी मांडण्यासाठी येत असल्याचे चित्र ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये दिसून येत आहे.

बॉक्स

असे होते तालुकानिहाय प्रशासक

तालुका ग्रा.प.संख्या प्रशासक संख्या

अमरावती ४६ १९

भातकुली ३६ १२

नांदगाव खं ५१ १९

चांदूर रेल्वे २९ १४

धामणगाव रेल्वे ५५ १८

तिवसा २९ १७

मोर्शी ३९ १५

वरूड ४१ १५

चांदूर बाजार ४१ १४

अचलपूर ४३ १९

अंजनगाव सुर्जी ३४ ११

दर्यापूर ५० २०

चिखलदरा २३ ११

धारणी ३५ १३

एकूृण ५५२ २१७

कोट

कोरोनामुळे निवडणूक लांबल्याने ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे सोपविला होता. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार असल्याने ग्रामस्थांची ग्रामपंचायतींशी संबंधित कामे वेळेवर होऊ शकत नव्हती. सरपंच निवडल्या गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

- विपीन अनोकार, सरपंच, निमखेड बाजार