शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

९८ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’

By admin | Updated: February 11, 2015 00:37 IST

जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते.

लोकमत विशेष
भंडारा : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी जमिनीच्या तपासणीत निरूत्साही असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २ लाख १३,५४८ शेतकऱ्यांपैकी २,६१२ शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले आहे. एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनीच माती परीक्षण केले आहे.
भंडारा जिल्ह्यात ८७५ गावांचा समावेश आहे. सन २०१४-१५ या चालू वर्षासाठी १८० गावांतील ३,३८५ माती परीक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने परीक्षणासाठी पाठविलेल्या २,२०० नमुन्यांचे माती परीक्षण करण्यात आले. माती परीक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. परीक्षणासाठी कृषी विद्यापीठ व भूजल परीक्षण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी-जास्त प्रमाण लक्षात कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून उत्पादन वाढविता येते. शेतकऱ्यांसाठी हे परीक्षण फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवरच भर देतो. ठिबकचे अनुदान मिळण्यासाठी हे परीक्षण बंधनकारक आहे. किंबहुना अनेक शेतकऱ्यांचे माती परीक्षण ठिबक कंपन्याच करून आणतात व अनुदानासाठी परस्परच परीक्षणाचा अहवाल जोडतात. वास्तविकता माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पद्धतीने शेती करणे कठीण झाले असून माती परीक्षण गरजेचे झाले आहे.
अशी आहे परिक्षण पद्धती
मातीचे तीन टप्प्यात तर पाण्याच्या नमुन्यांचे एकाच टप्प्यात परीक्षण केले जाते. मातीमध्ये सर्वसाधारण ३५ रुपए, विशेष २७५ रुपए, सुक्ष्म पद्धती २00 रुपए तर पाणी परीक्षणासाठी ५0 रुपए यांनुसार दर आकारणी केली जाते.
माती-पाणी परिक्षण गरजेचे
सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीची पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
असा असावा मातीचा नमुना
माती परीक्षणासाठी शेतात ८ ते १0 ठिकाणी एक फूट लांब, रुंद खड्डा खोदावा. खड्ड्याच्या चारही बाजूची माती एकजीव करून माती परीक्षणासाठी आवश्यक असते. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोत बिघडते. यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होतो.
मातीमध्ये असतात १६ ते २0 घटक
भंडारा जिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २0 घटक आढळून येतात. जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक आहे. यामुळे येथील शेतीत पालाश मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यानंतर नत्र कमी व स्फुरद मध्यम प्रतीत आढळतात. यासोबतच सुक्ष्म खते, मंगल, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.
दर तीन वर्षांनी माती तपासणी करणे आवश्यक आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतामधील पाणी, मातीत पानांचे परीक्षण महत्वाचे आहे. सोबतच ओलीत क्षेत्राची माती तपासणी नमुना आधारीत खताची मात्रा द्यावी. यामुळे उत्पादन क्षमता वाढेल व खताच्या खर्चात बचत होईल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण करावे .
- एम. व्ही. मुऱ्हेकर,
जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, भंडारा.