शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

व-हाडात ३१ दिवसांत ९१ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला, कर्जमाफीनंतरही थांबेना आत्महत्यांचे सत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 16:20 IST

बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने कर्जमाफी केली; मात्र त्याचा फायदा किती शेतक-यांना मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने कर्जमाफी केली; मात्र त्याचा फायदा किती शेतक-यांना मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. जगावे कसं? या विवंचनेत शेतक-यांच्या संघर्षावर नैराश्य भारी ठरत आहे. याचमुळे व-हाडात यंदा जानेवारी महिन्यात ९१ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात  ३१ जानेवारी २०१८ पर्यंत १४ हजार ७४९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ६०७ प्रकरणे पात्र, ८ हजार ३७ अपात्र, तर १४५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा जानेवारी महिन्याच्या ३१ दिवसांत ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३, अकोला ११, यवतमाळ १८, बुलडाणा २८, वाशिम ३ व वर्धा जिल्ह्यात ९ शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. विभागात दरदिवशी तीन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. शेतकरी आत्मत्यप्रवण म्हणून ओळख असलेले अमरावती, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात आत्महत्या कमी झाल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र शेतकरी आत्महत्येच सत्र सुरू आहे.अपुरा पाऊस, बोंडअळीचा प्रकोप, सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यासह अन्य यासह अन्य कारणांमुळे शेतक-यांना नैराश्य येत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 

मृत्यूनंतरही शेतकरी कुटुंबांची उपेक्षाचविभागात सन २००१ पासून १४ हजार ७८९ शेतक-यांच्या अत्महत्या झाल्यात यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक आठ हजार सात प्रकरणात शासकीय मदत नाकारण्यात आली. मृत्यूपश्चातही शासनाच्या अनास्थेने बळीराजाच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. दीड दशकातनंतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फक्त एक लाखाची मदत मिळत आहे. त्यातही ३० हजार बँक खात्यात, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांसाठी संयुक्त खात्यात ड्रॉफ्ट स्वरूपात आहे. त्यामुळे कुटुंबाचा कर्ता गमावल्यानंतर त्या परिवाराला कामाला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी