शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

व-हाडात ३१ दिवसांत ९१ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला, कर्जमाफीनंतरही थांबेना आत्महत्यांचे सत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 16:20 IST

बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने कर्जमाफी केली; मात्र त्याचा फायदा किती शेतक-यांना मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने कर्जमाफी केली; मात्र त्याचा फायदा किती शेतक-यांना मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. जगावे कसं? या विवंचनेत शेतक-यांच्या संघर्षावर नैराश्य भारी ठरत आहे. याचमुळे व-हाडात यंदा जानेवारी महिन्यात ९१ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात  ३१ जानेवारी २०१८ पर्यंत १४ हजार ७४९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ६०७ प्रकरणे पात्र, ८ हजार ३७ अपात्र, तर १४५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा जानेवारी महिन्याच्या ३१ दिवसांत ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३, अकोला ११, यवतमाळ १८, बुलडाणा २८, वाशिम ३ व वर्धा जिल्ह्यात ९ शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. विभागात दरदिवशी तीन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. शेतकरी आत्मत्यप्रवण म्हणून ओळख असलेले अमरावती, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात आत्महत्या कमी झाल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र शेतकरी आत्महत्येच सत्र सुरू आहे.अपुरा पाऊस, बोंडअळीचा प्रकोप, सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यासह अन्य यासह अन्य कारणांमुळे शेतक-यांना नैराश्य येत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 

मृत्यूनंतरही शेतकरी कुटुंबांची उपेक्षाचविभागात सन २००१ पासून १४ हजार ७८९ शेतक-यांच्या अत्महत्या झाल्यात यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक आठ हजार सात प्रकरणात शासकीय मदत नाकारण्यात आली. मृत्यूपश्चातही शासनाच्या अनास्थेने बळीराजाच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. दीड दशकातनंतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फक्त एक लाखाची मदत मिळत आहे. त्यातही ३० हजार बँक खात्यात, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांसाठी संयुक्त खात्यात ड्रॉफ्ट स्वरूपात आहे. त्यामुळे कुटुंबाचा कर्ता गमावल्यानंतर त्या परिवाराला कामाला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी