शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार हेक्टर जमीन दलालांच्या घशात

By admin | Updated: August 23, 2014 01:17 IST

ब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे.

मोहन राऊत अमरावतीब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४० हजार हेक्टर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली असून गावातील मंदिराच्या मालकीची जमीन, गावाशेजारचे गायरान तसेच कुळाच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार काही मोजक्या तलाठ्यांच्या सहकार्याने तीन वर्षांत युध्दस्तरावर पार पडले असून ही जमीन दलालांच्या घशात अडकल्याची धक्कादायक माहिती आहे़ ब्रिटिश काळापासून प्रत्येक गावात सार्वजनिक उत्सवासाठी जागा आरक्षित असते तसेच स्मशानभूमि, सार्वजनिक मंदिरे, पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम आदी सार्वजनिक कामांकरिता ग्रामपंचायतींमध्ये या जागेची नोंद असते. या जागेच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची असली तरी गावातील या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून ग्रामपंचायतीच्या आठ ‘अ’ ला नोंदणी करण्याचे प्रकार वाढले आहेत़ विशेषत: अशा जागेवर अनधिकृत बांधकाम करून ही जागा अनेक गावातील पुढाऱ्यांनी आपल्या नावाने केली आहे़ गावातील जनावरे चारण्यासाठी प्रत्येक गावाच्या परिसरात गायरान म्हणून जागा अनेक वर्षांपासून आरक्षीत असतांना ही जागा तलाठ्यांना हातात घेवून स्वता:च्या नावाने जागा मालकीची करण्यात आली आहे़ भोगवट वर्ग २ असताना महसुल प्रशासनाच्या हातात गठ्ठा देवून भोगट वर्ग १ अशी जमिनीची नोंद करून या जमिनीची विक्री करण्याचे व्यवहार मागील तिन वर्षात जिल्ह्यात पार पडले आहे़ शाळांच्या जमिनीवर वाढले अतिक्रमणप्रत्येक गावात जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या जमिनी आहेत़ दरवर्षी या जमिनींचा एक वर्षाकरिता पिके घेण्यासाठी लिलाव केला जातो. शिक्षण विभागाला यातून रक्कम मिळत असली तरी अशा जमिनीवरही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे़ शासनाच्यावतीने कोणतेच पाऊल उचलले जात नसल्यामुळे ही जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आहे़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा या तीन तालुक्यांतील शाळांच्या जमीनी ग्रामस्थांच्या ताब्यात गेल्या आहेत़ महसूल प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष दिल्यास शासकीय जमीनीचा लेखाजोखा बाहेर निघण्याची शक्यता आहे़कुळाच्या जमिनीही घशातरहिवाशाचा मृत्यू झाल्यास व त्याला वारस नसल्यास त्यांच्या जमिनीवर दलालांनी ताबा दाखविला आहे़ जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खोटे खरेदी खत करून या जमिनी दलालांनी बळकावलेल्या. गावातील तलाठ्यांनी कोणताही जाहीरनामा न काढता अथवा जमिनी सरकारजमा न करता सातबारावर थेट दलालाचे नाव चढविले.देवस्थांनाच्या जमिनीवर चढली खासगी नावेशासकीय ई-क्लास जमिनीचे सर्व दस्तऐवज संबंधित तहसील कार्यालयात आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियमबाह्यरित्या कोणी गैरपवार करुन जमिनी नावावर करीत असल्याचे आढळून आल्यास त्याची तपासणी करुन त्यांच्यावर रीतसर शासकीय नियमानुसार कारवाई केली जाईल. - तेजुसिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.ज्या विभागाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेले आढळले असेल त्या विभागाने ते अतिक्रमण काढावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. यासंदर्भात उपविभागातील तलाठी तसेच विविध विभागांकडून माहिती घेतली जाईल, असा काही गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल. शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाचा प्रकार गैर आहे. - नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी.