शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात २२.४४ लाख हेक्टर बाधित; १५४३.६७ कोटींची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:19 IST

पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल; पश्चिम विदर्भात २०.२५ लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

अमरावती : विभागात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या परतीच्या पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठविला आहे. यामध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १५४३ कोटी ६७ लाखांच्या अपेक्षित निधीची मागणी केली आहे.

अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे विभागात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश २९ ऑक्टोबरला दिले होते. त्यानुसार गुरुवारी हा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील १२ लाख २६ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

कपाशीचे ८ लाख २१ हजार २७० हेक्टर, खरीप ज्वारी ४२ हजार ९६ हेक्टर, तुरीचे ५१ हजार ३४३ हेक्टर, मका पिकाचे ३१ हजार ३४१ हेक्टर, धान पिकाचे ५ हजार ५३८ हेक्टर, उदीड पिकाचे ९ हजार २८९ हेक्टर व इतर खरीप पिकांचे ३६ हजार ६६९ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे संयुक्त पंचनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी राट्रीय आपदा कोषातून (एनडीआरएफ) १५१२ कोटी २८ लख ९८ हजारांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांनी महसूल विभागाकडे केली आहे. जिल्हा व पिकनिहाय नुकसान (हेक्टर/लाखात)

जिल्हा         शेतकरी       सोयाबीन       कपाशी        बाधित क्षेत्र      अपेक्षित निधीअमरावती    ३७४८०४    २१२३२९        १३५४७२      ३७३०१९        २५३६५.३५    अकोला       २९७६६८     १७३४०५      १५३०९५      ३६३०५९       २४८२४.७१यवतमाळ    ४३२१००      २०९६८६      ३०२१४७      ५२१००४        ३५४२८.२७बुलडाणा    ६३४०७९      ३७१२५४      २०९९२०      ६८१२०५        ४६३२१.९८वाशीम        २४६३९४     २५९७०१      २०६३५        २८३६५६        १९२८८.६७एकूण       १९,८५,०४५   १२,२६,३४६   ८,२१,२७०   २२,२३,९५५    १५१२,२७९८

असे आहे बागायती व फळपिकांचे नुकसान

विभागात २७ हजार ५६९ शेतकºयांच्या १२ हजार २३ हेक्टरमधील बागायती पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये केळी/पपई ८६१ हेक्टर, भाजीपाला ९३३८ हेक्टर, हरभरा ४०७ हेक्टर, ५.४० हेक्टर गहू, ४.४ हेक्टर मका, १५५ हेक्टर हळद व इतर पिकांचे १२५० हेक्टरमध्ये नुकसान झाले. यासाठी १६ कोटी २३ लाख १७ हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली. 

विभागात १२ हजार ५८३ शेतकºयांच्या ८४१९ हेक्टरमधील फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये ४०३२ हेक्टरमधील संत्रा, मोसंबी, लिंबू, ८७ हेक्टरमध्ये आंबा, ९०८ हेक्टरमध्ये डाळिंब, १९३७ हेक्टरमध्ये केळी, पपई, ४८ हेक्टरमध्ये पेरू, २०६ हेक्टरमध्ये द्राक्ष व इतर फळपिकांचे ११९८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. यासाठी १५ कोटी १५ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती