शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव बारी परिसरात २०० हेक्टर शेतीचे नुकसान

By admin | Updated: July 27, 2014 23:31 IST

सतत तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव बारी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेताचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

अंजनगाव बारी : सतत तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव बारी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेताचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अंजनगांव बारी परिसरातील २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण पीक खरडून गेले. उगवलेले सोयाबीन व कपासीचे पीक नष्ट झाले. अंजनगाव बारीत थड्डीपटा, गोविंदपूर, उतखेडा, वळगांव झिरे, निंभोरा, लाटे, खिरसाना, निरसाना, पाडुळातील चंदापूर भागातील पीक खरडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. भिवापूर तलाव भरल्यामुळे तलावाची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. कोंडेश्वर तलाव ७० टक्के भरला आहे. गरभपीर तलाव ६० टक्के भरले असून अडगाव तलाव ९० टक्के भरला आहे. भिवापूर तलाव १०० टक्के भरला आहे. सावंगा तलाव ९५ टक्के भरला आहे. संपूर्ण पाटबंधारे तुडूंब भरले आहेत. विहिरींची पातळी वाढली असून शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी साचल्याने सोयाबीन सडले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले आहे. जवळपास अंजनगांव बारी परिसरातील १० लाख रुपयाच्या वर नुकसान झाले असून संत्रा, मोसंबी, निंबू इत्यादी फलोत्पादनाची वादळी पावसामुुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका फळभाज्या पालक, सांबार, वांगी, टमाटर मिरची कारली या पिकांनाही बसला आहे. संत्राच्या आंबिया बार संपूर्ण गळून पडला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोेठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. यंदा येथील शेतकऱ्यांनी उसनवार करुन शेतात महागडे बियाणे पेरले. परंतु पहिल्याच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. घरे पडल्याची पाहणी करणाऱ्या पथकामध्ये सरपंच लक्ष्मणराव कदम, पंचायत समिती सदस्य भास्कर गभणे, ग्राम विकास अधिकारी पातालिया वगळता तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)