शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विकासासाठी १००० कोटी

By admin | Updated: January 12, 2017 00:05 IST

खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

अमरावती : खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रयत्नातून कृषी संजीवनी योजनेंतर्गत हा निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची बैठक मुंबई येथील सह्याद्री वसतिगृहात बुधवारी पार पडली. यावेळी अमरावती जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रकल्पांतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा तसेच मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगावचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. ४ हजार कोटींचा प्रकल्पअमरावती : प्रकल्पाकरिता जागतिक बँकेकडून २८०० कोटी मिळणार असून राज्य शासनाच्या १२०० कोटींच्या वाट्यासह एकूण ४००० कोटींचा निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. खारपाण पट्ट्यांतर्गत सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या अमरावती जिल्ह्यास १००० कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. याबैठकीला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांचे प्रयत्न, खारपाणपट्ट्यासाठी उपलब्धी पाण्याच्या ताळेबंदाने होणार पिकांचे नियोजन याप्रकल्पांतर्गत समूहपद्धतीने गावांची निवड करून शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीकनियोजन करण्यात येणार आहे. तसेच कृषी अवजारे विविध सुविधा केंद्राद्वारे लहान शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर पुरविण्यात येणार आहे व खारपाण पट्ट्यातील जमीन व्यवस्थेसाठी सर्व बाधित गावांचा समावेश करुन विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.हवामान बदलास अनुसरून साधणार कृषीविकास हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांचे कृषी उत्पादकतेमध्ये वृद्धी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे हा नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.