शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पारशी समाजाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 18, 2014 01:44 IST

केवळ उरली तीन कुटुंब ; पारशी नवीन वर्ष विशेष

नितीन गव्हाळे / अकोलापारशी माणूस म्हटला की आर्थिकदृष्ट्या सधन. ज्याही ठिकाणी पारशी समाज वास्तव्यास गेला. त्या ठिकाणी पारशी समाजाने त्या शहराच्या विकासाला हातभार लावला. अकोल्यासारख्या शहराच्या विकासामध्येही पारशी समाजाने हातभार लावला. उद्योग, व्यापाराच्या माध्यमातून अकोला शहरात स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या पारशी समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कधीकाळी १00 च्या जवळपास संख्या असलेल्या पारशी समाजाची आजमितीस शहरात केवळ तीन कुटुंब उरली आहेत. सोमवारपासून पारशी नवीन वर्षाला सुरुवात होते आहे. त्यानिमित्ताने शहरातील पारशी समाजाच्या योगदानाचा, त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णने केला. १0 च्या दशकामध्ये इराणमधील पारशी उर्फ झरथुष्ट्र धर्माचे लोक अरबी आक्रमकांच्या अत्याचाराला त्रासून भारतामध्ये आले. गुजरातसोबतच देशातील इतर राज्यांमध्ये दुधात साखर मिसळावी तसा हा समाज तेथील संस्कृतीशी समरस झाला. अकोल्यासारख्या शहरामध्येही १८७0-८0 च्या काळात पारशी समाजातील काही कुटुंब स्थायिक झाली. उद्योग व व्यापाराच्या माध्यमातून पारशी समाजाने अल्पावधीतच शहरात स्वत:ची ओळख निर्माण केली; परंतु वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक पारशी कुटुंबाने आपले खासगीपण जपले. त्यांच्या अग्यारीत अन्य धर्मियांना प्रवेश दिला जात नसल्याने या समाजाविषयी अन्य समाजाच्या मनात आदर आणि परकेपणाची भावनाही निर्माण झाली. आजमितीस तर पारशी समाज पूर्णत: परका होतो की काय, अशी खंत व्यक्त होऊ लागली. *१९३८ च्या काळात उभारली अग्यारीअग्यारी हे पारशी समाजाचे प्रार्थनास्थळ आहे. १९३८ च्या काळात शहरात पारशी समाजाने पंचायत समितीसमोर अग्यारी उभारली. ही अग्यारी पश्‍चिम विदर्भात एकमेव आहे. एकेकाळी पतेतीला या अग्यारीमध्ये चांगलीच वर्दळ पाहायला मिळायची; परंतु पारशींची संख्या कमी झाल्याने या अग्यारीमध्ये फारसं कुणी दिसत नाही. पारशी अग्यारी अस्तित्वाचं प्रतीक म्हणून उभी आहे. *१९0१ मध्ये शहरात होते ८३ पारशी१९0१ च्या काळात शहरामध्ये राहणार्‍या पारशींची संख्या ८३ होत; परंतु ती घटून केवळ १३ वर आली आहे. त्यामागची कारणे वेगवेगळी आहेत. शहरातील काही कुटुंबे शिक्षण, व्यापाराच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित झाली. काही लोक मरण पावले. त्यामुळेच की काय? पारशींची संख्या शहरात बोटांवर मोजण्याइतपत राहिली आहे.