शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : धान्य, फळे, भाजीपाला आता अल्पावधीतच वाळणार!

By admin | Updated: February 18, 2017 18:39 IST

  राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत अकोला, दि. १८ -  सौर ऊर्जा वापरून धान्य, फळे तसेच भाजीपाला अल्पावधीतच वाळण्यासाठीचे तंत्रज्ञान ...

 
राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १८ -  सौर ऊर्जा वापरून धान्य, फळे तसेच भाजीपाला अल्पावधीतच वाळण्यासाठीचे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे ‘सोलर ड्रायर’ (सोलर शुष्कक) तंत्रज्ञान असून, वाळविताना भाजीपाला, फळांची गुणवत्ता कायम राहत असल्याने या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.
देशात मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग धान्य, फळे व भाजीपाला वाळविण्यासाठी करता येतो. सौर शुष्कक वापरल्यास पदार्थातील पोषण, तत्त्वे, चव, रंग आणि गुणवत्ता कायम राहते. तसेच कमीत, कमी वेळेत सुकवता, तर येतेच शिवाय जास्त काळ टिकवून ठेवता येत असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने सोलर शुष्ककचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखविण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने अकोला येथे अर्धगोलाकार आकाराचे शुष्कक विकसित केले आहे. या सौर शुष्ककाची उत्पादन वाळविण्याची क्षमता १00 किलो एवढी आहे. यामध्ये औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पानपिंपरी, हळद, मिरची, तसेच आवळा कॅन्डी, बटाटे चिप्स, हिरवा भाजीपाला इत्यादी वाळविण्यासाठी शुष्ककाचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत फायदेशीर आहे.
कृषी विद्यापीठात अर्ध दंडगोलाकार शुष्कक बनविण्यात आला असून, यावर पाईपचे सांगाडे लावले आहे. त्याला अल्ट्राव्हायलेट पॉलीथिलीन फिल्मने झाकली आहे. या शुष्ककामध्ये दिवसा हरितगृह परिणामामुळे आतील तापमानात वाढ होते. आतील तापमान हे वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २0डिग्री से. अधिक राहते.व दुपारी १२ ते २ या वेळेत ते ६0 ते ६५ डीग्री से. पर्यंत पोहोचते. जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनवलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे.  काळ्य़ा रंगाच्या गुणधर्मानुसार १00 टक्के उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते. शुष्ककातील वाढलेल्या तापमानामुळे व गरम हवेच्या प्रवाहामुळे धान्य, भाजीपाला तसेच फळे लवकर वाळण्यास मदत होते. या शुष्ककातील गरम हवा व अतिनील किरणामुळे पदार्थातील आद्र्रता कमी होऊन पदार्थ वाळतात. विशेष म्हणजे यावर पावसाचा तेवढा परणिाम होत नाही. गृहोद्योग, कृषी उद्योगाकरिता या तंत्रज्ञानाचा उत्तम फायदा होणार आहे.
पारंपरिक पद्धतीत पदार्थावर धूळ बसते, पक्षी, प्राण्यांची विष्ठा पडते व वाळण्यास बराच वेळ लागतो. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.
- सोलर शुष्कक तंत्रज्ञान किफायतशीर असून, गृह, कृषी उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर आहे. शेतकर्‍यांना हे तंत्रज्ञान बघण्यासाठी खुले आहे.
- डॉ. सुरेंद्र काळबांडे, संशोधन अभियंता, नवीकरणीय ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवि,अकोला.

 

https://www.dailymotion.com/video/x844req