शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हजारो झाडांची राजरोस कत्तल, कारवाई शून्य

By admin | Updated: May 26, 2015 02:36 IST

बांधकाम विभाग, वनविभाग व महसूल विभाग हे तीनही विभागाचे दुर्लक्ष.

अकोला : रस्त्यालगत असलेल्या हजारो झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात येत असून, याकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभाग, वनविभाग व महसूल विभाग हे तीनही विभाग याला जबाबदार असून, हजारो झाडांची कत्तल होऊनसुद्धा एकही तक्रार झाली नाही. तसेच कुणालाही शिक्षा झाली नाही. या प्रकाराला आळा घालण्याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे शेकडो झाडांची होणारी कत्तल रोखणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत असून, विविध आजारांचा प्रभाव वाढत आहे. हे रोखण्याकरिता वृक्ष लागवड करण्याची गरज असताना सर्रास वृक्षतोड करण्यात येत आहे. गत सात ते आठ वर्षांपूर्वी या विकृत मानसिकतेचा जन्म झाला. तेव्हापासून संपूर्ण विदर्भातील अनेक रस्त्यावर हजारो झाडांची कत्तल करण्यात आली व करण्यात येत आहे. ही कत्तल रोखण्याची प्राथमिक जबाबदारी बांधकाम विभागाची असली तरी वनविभाग व महसूल विभागही यामध्ये दखल घेऊन वृक्ष तोडणार्‍यांवर कारवाई करू शकतो. त्यासंबंधीची तक्रार देऊ शकते. मात्र, या तीनही विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. रस्त्यालगत दोन्ही बाजूने शंभर ते दीडशे वर्षांंपूर्वी इंग्रजांनी कडूनिंब, बाभुळासह अन्य प्रजातींची झाडे लावली आहेत. मोठमोठी असलेली ही झाडे तोडण्यावर बांधकाम विभागाचे बंधन आहे. या झाडांच्या खोडांवर बांधकाम विभागाच्या वतीने लाल व पांढरा रंग देण्यात आला आहे. रस्त्यावरून नेहमीच वाहतूक होत असल्यामुळे ही झाडे कुर्‍हाडीने तोडणे शक्य होत नाही. त्यामुळे नवीन शक्कल लढविण्यात आली. झाडाच्या बुंध्याशी विस्तव टाकण्यात येतो. हळूहळू विस्तव पेटत जातो व झाडही पेटते. त्यानंतर झाड बुडातून पूर्ण त: जळाल्यानंतर कोसळते. झाड पडल्यावर रात्रीच्या सुमारास झाडाच्या फांद्या तोडण्यात येतात व त्या लं पास केल्या जातात. त्यानंतर दुसर्‍या रात्री खोड तोडून नेण्यात येते. दोन ते तीन दिवस हा कार्यक्रम सुरू असतो. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करतो तर, वनविभागही बांधकाम विभागाकडे बोट दाखवितो.