शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता मिशन’ची ‘ऐसीतैशी’

By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST

कच-याचे ढीग आणि दुर्गंधीने अकोलावासी हैरान.

संतोष येलकर/अकोलादेशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत असले तरी, अकोला शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला साचलेले कचर्‍याचे ढीग आणि दुर्गंधीने शहरवासी हैरान झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता मिशनची शहरात ऐसीतैशी होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गेल्या २ ऑक्टोबरपासून देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. त्यानुषंगाने सर्वत्र स्वच्छता मिशनची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्वच्छतेच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. सगळीकडे स्वच्छतेचा बोलबाला सुरू असताना अकोल्यात मात्र, विविध भागात रस्त्यांवर आणि रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचल्याचे वास्तव रविवारी दिसून आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते टॉवर चौक, भाजी बाजार, बस स्थानकामागील परिसर, फतेह चौक ते दीपक चौक, आकोट स्टॅन्ड व इतर भागात रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले असून, हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. वार्‍याच्या सुसाट्यात रस्त्यांवरून कचरा उडत आहे. उडणारा कचरा डोळ्यात जात आहे. तसेच भाजी बाजार, शासकीय विश्रामगृह समोर व बस स्थानकामागील परिसरात रस्त्यांवर सडका भाजीपाला, हिरव्या नारळाची टरफले, प्लास्टिक पिशव्या, पृष्ठ आणि कागदाचे तुकडे व काडीकचरा कुजत असून, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतर भागातही असेच असाच अनुभव येत असून, कचर्‍याच्या ढिगांसोबतच मोकाट जनावरांचा मुक्त संचारही सर्रास सुरू आहे. कचर्‍याच्या समस्येने नागरिक हैरान असून, यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ते बघता स्वच्छता मिशनचा अकोल्यात बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे.