शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

दहीहांडा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला ...

लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र शासनाने जनतेला प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू आणि तांदूळ दिले होते. गहू आणि तांदळावर जीवन जगता येते का? जीवन जगण्याकरिता इतरही जीवनाश्यक वस्तूंची गरज भासते. नोव्हेंबर २०२० पासून गोरगरीब जनता कामधंद्यांच्या शोधात असून, कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्ग, गोरगरीब जनतेसमोर संकट उभे थाटले आहे. मजूर वर्गाच्या हाताला कोणतेच प्रकारचे कामधंदे नसल्यामुळे मजूर वर्गावर व इतर छोट्या व्यापारी वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. दैनंदिन जीवनात खाद्यतेल लागतेच, सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १४५ रुपये किलो, साखर ४० रुपये, गूळ ५० ते ६० रुपये किलो विकल्या जात आहे. काही महिन्यांपासून दहीहांडा येथील बाजार भरत नसल्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बाजार भरत नसल्यामुळे बाहेर गावाचे व्यापारी येत नाहीत. गावातील काही व्यापारी याचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लुबाडणूक करीत आहेत. दहीहांडा येथे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. भाजीपाला व्यापारी दामदुपटीने विक्री करीत आहेत. यासाठी बाहेरगावच्या व्यापारी वर्गाला गावात येऊन व्यापार करण्याची नियमानुसार परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच व्यापारी वर्गाकडून गोरगरीब जनतेची लूट थांबवावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.