शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाड्याचा दरवाजा एक, शेतीलाही नाही धुरा!

By admin | Updated: May 15, 2015 01:14 IST

आंतरराष्ट्रीय एकत्र कुटुंब दिवस; खामगावात नांदते ३५ जणांचे एकत्र कुटुंब.

गिरीश राऊत / खामगाव : काळ बदलला तसे नातेही बदलल्याचे चित्र आताच्या परिस्थितीत दिसून येते; मात्र असे असतानाही काही कुटुंबांनी एकत्र नांदण्याचा आदर्श टिकवून ठेवला आहे. मानपान, रुसवे-फुगवे तर सर्वच कुटुंबात असतात; परंतु एकत्र कुटुंबाचे फायदेच अधिक असल्याने अशा रुसव्या-फुगव्याचे आयुष्य फार थोडे असते. खामगाव शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळख असलेल्या सुटाळपुरा भागातही असे एक एकत्र कुटुंब सुखनैव संसार करीत आहे. या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या वाड्याला एकच दरवाजा असून, ७0 एकर श्ो तीला धुरा नाही. वयाची ८६ वर्षे गाठणारे विश्‍वनाथ दळी हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांना ५ मुले व १ मुलगी. मुलांची लग्न झाल्यानंतर हे कुटुंब १२ सदस्यांचे झाले. नातू झाल्यानंतर ही कुटुंब सं ख्या २८ वर पोहोचली; मात्र तरीही कुटुंब विभक्त झाले नाही. या २८ जणांसाठी किराणा एकत्रच व स्वयंपाकसुद्धा एकत्र. घरखर्च हा शेतीतून आलेल्या मिळकतीतून. घराचा व्यवहार विश्‍वनाथ दळी तसेच सर्व मुलांकडे; मात्र कोणाला काही गरज पडली तर त्याने सांगायच्या आधीच ती गरज ओळखून त्याला ती पुरविणे हे कुटुंबाचे वैशिष्ट्य. यामुळे कोणालाही आ पली परवड होत असल्याची जाणीव झाली नाही. शेत, किराणा दुकान, म्हशी यामुळे शक्य तोवर ज्या वस्तू गरजेच्या आहे त्या घरातच असल्याने कोणालाही कशाची भ्रांत पडली नाही. विश्‍वनाथ दळी यांच्या नातवांची लग्ने झाल्यानंतर कुटुंबाचा पुन्हा विस्तार होऊन ही संख्या वाढत जाऊन ३0 तर आज त्यांचे पणतू अशी आता कुटुंबातील सदस्य संख्या ३५ एवढी झाली आहे. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. धावपळीचे युग सुरू झाले. अशा परिस्थितीत एकत्र स्वयंपाक त्यासाठी लागणारा वेळ व घराबाहेर पडल्याची वेळ. ऐन कामाच्या वेळी मुलांचा आईजवळ राहण्याचा हट्ट, शाळेसाठी त्यांना लागणारा डबा यांचा ताळमेळ बसविण्यासाठी म्हणून आता फक्त चुली वेगळ्या आहेत.