शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची उदासीनता; थकीत पाणीपट्टीचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अकोला : जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ...

अकोला : जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ८४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची २० एप्रिलपर्यंत ४२ कोटी २९ लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टीची रक्कम थकीत असल्याने, वीज देयकांच्या थकबाकीचा भरणा करणे जिल्हा परिषदेला कठीण झाले आहे. त्यामुळे दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. त्यानुषंगाने योजनेंतर्गत ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८४ खेडी व ६४ खेडी या दोन सर्वात मोठ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत असलेल्या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. परंतु ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टीच्या वसुलीच्या कामाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने, २० एप्रिलपर्यंत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची ४२ कोटी २९ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी थकीत असल्याने योजनांचे वीज देयक, देखभाल दुरुस्ती व पाणी आरक्षणाच्या रकमेचा भरणा जिल्हा परिषदेला करावा लागत आहे. त्यामध्ये वीज देयकांच्या थकीत रकमेचा भरणा करणे जिल्हा परिषदेला कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीज देयकांपोटी गत महिनाभरात महावितरणमार्फत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. १ कोटी २० लाख रुपयांचे वीज देयक अद्याप थकीत असल्याने, देयकाचा भरणा न केल्यास पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा पुन्हा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यास योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

योजनानिहाय अशी आहे पाणीपट्टी थकीत!

६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना : ३५ कोटी रुपये

८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना: ७ कोटी २९ लाख रुपये

‘बीडीओं’चा कानाडोळा;

कोट्यवधींची पाणीपट्टी थकीत !

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना निर्देश देऊन व पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसूल करण्याच्या कामाला संबंधित पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु या कामाकडे संबंधित ‘बीडीओं’कडून कानाडोळा करण्यात येत असल्याने दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.