शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भारताने जगाला विज्ञानासोबतच संस्कृती दिली-श्रीधर गाडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:33 IST

कस्तुरी व्याख्यानमाला

अकोला: जगामध्ये सर्वश्रेष्ठ आपला देश आहे. सर्वात प्राचीन आणि पवित्र आहे. भारताने जगाला विज्ञानासोबतच संस्कृती दिली आहे; मात्र जी वस्तु सहज उपलब्ध होते. त्याचे महत्त्व समजू शकत नाही, हा मनुष्याचा स्वभाव आहे. याच स्वभाव गुणामुळे एकेकाळी अत्युच्च असलेल्या भारताचे आज अध:पतन होत आहे, अशी खंत ज्येष्ठ वक्ते श्रीधर गाडगे (नागपूर) यांनी व्यक्त केली.कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी आणि सुनंदा शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालयाच्यावतीने आयोजित कस्तुरी व्याख्यानमालेत शनिवारी श्रीधर गाडगे ‘पुण्यभूमि भारत’ या विषयावर बोलत होते. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत की, जे आक्रमणांमध्ये नष्ट झाले आहेत. आमच्या देशातील माणूस तर १९४७ पर्यंत आक्रमकांशी सतत लढत आला आहे; मात्र देश कधी नष्ट झाला नाही. देशाची संस्कृती नष्ट नाही झाली. देश टिकून राहिला. कारण भारताकडे भक्कम विचार आहे. विज्ञान आहे. नैतिक वृत्तीवर देशाचे मूल्यांकन ठरत असते. आज नैतिकतेत त्रुटी निर्माण झाल्या आहेत. नैतिकतेचे अध:पतन झाले आहे. ज्या देशात स्त्रीयांचे पूजन होते, त्याच देशात आज भोगवाद वाढला आहे. स्त्रीयांना केवळ भोगाची वस्तु म्हणून पाहिल्या जात आहे. स्त्रीयांवर शारीरिक अत्याचार होत आहेत. एकेकाळी भारताला जगतगुरू म्हणून ओळखल्या जायचे. कारण भारताकडे सामर्थ्य होते. आजच्या पिढीला मात्र भारताचे हे वैभव माहीत नाही. कारण व्यवहारिक शिक्षणात अशी कुठे मांडणीच नाही. देश समजून घेणे म्हणजे धार्मिक शिक्षण नाही. पुण्यभूमि भारत अशा प्रकारचे विषय युवकांनी ऐकले पाहिजे. ते ऐकत नाहीत. म्हणून आज देशात ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे गाडगे म्हणाले.जगाला सापेक्षता, नवग्रहांचा विचार, ग्रहण, दहा दिशा, कालगणना, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, अणुबॉम्ब आदींचे ज्ञान भारताने जगाला दिले आहे. वेद, पुराण, शास्त्रांमध्ये यांचा उल्लेख आहे. आज विज्ञान शोध घेत असताना या सर्वाची उकल होत असल्याचेही गाडगे यांनी सांगितले.तत्पूर्वी, उद्घाटनप्रसंगी माजी आमदार वसंतराव खोटरे, विद्यालयाचे अध्यक्ष शांताराम बुटे, वक्ते श्रीधर गाडगे, कस्तुरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.किशोर बुटोले व्यासपीठावर विराजमान होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन व्याख्यानमालेला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संजय गायकवाड यांनी केले. वक्त्यांचा परिचय यशवंत देशपांडे यांनी करू न दिला. आभार संजय ठाकरे यांनी मानले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक