शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक संपावर; गावं वार्‍यावर..

By admin | Updated: July 14, 2014 23:49 IST

ग्रामसेवक तब्बल १५ दिवसांपासून संपावर गेलेल आहेत.

ग्रामविकासाचा कणा मानल्या जाणारे ग्रामसेवक तब्बल १५ दिवसांपासून संपावर गेलेल आहेत. परिणामी गावांना बकालपण आले असून, याचा फटका ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. याबाबत लोकमतने घेतलेला हा वेध..

** ग्रामसेवकांना प्रशासनाने बजाविल्या नोटीस..

जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्याने गावपातळीवर कामाचा खोळंबा झाला आहे. गावपातळीवर कारभार विस्कळीत झाला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने संपकरी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी कर्तव्यावर तातडीने रुजू व्हा अन्यथा महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम १९६४ नुसार योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. कर्तव्यात कसूर केल्याची बाब खपवून घेतली जाणार नाही, याचा उल्लेख कारणे दाखवा नोटीसमध्ये करण्यात आला.

** ग्रामसेवकांच्या अशा आहेत मागण्या..

ग्रामविकास अधिकार्‍यांना सुधारीत वेतन श्रेणी लागू करावी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकरीता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, १0 ग्रामपंचायतीमागे एक ग्रामविस्तार अधिकारी नेमावा, प्रवास भत्ता तीन हजार रुपये करावा, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे, विनाचौकशी निलंबन करण्यात येवू नये, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची एकतर्फी चौकशी व वसुली बंद करावी आदी मागण्या मार्गी लागेपर्यंत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ठोस आश्‍वासन अजून मिळाले नाही.

** विकासकामांचा बट्टय़ाबोळ

गत पंधरा दिवसापासून विविध मागण्यासाठी ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे विकासकामांचा बट्टय़ाबोळ होत आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प होत आहे. पाऊस लांबल्याने अनेक गावांवर पाणीटंचाईचे सावट आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामसेवक संपावर असल्याने नियोजन कोलमडले आहे. परिणामी, पाणीटंचाईच्या झळा ग्रामवासियांना घामाघूम करीत आहेत. कामबंद आंदोलनामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. नागरिकांना, विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीतून मिळणार्‍या दाखल्यांना उशीर होत आहे. त्या दाखल्याअभावी कामे थांबल्या गेली आहेत. गावातील कर वसुलीच थांबली असल्याने विकासाला निधीच मिळत नाही.

** आंदोलनात अडकले विद्यार्थ्यांचे दाखले

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप लागले आहे. जुलै महिना हा शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध कामांसाठी खर्‍या अर्थाने ह्यहंगामह्ण असतो. शेतकरी व विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत विविध प्रमाणपत्रांसाठी ग्रामसेवकांच्या दाखल्याची गरज आहे. शेतकर्‍यांसाठी जिल्हा परिषदेच्या विविध कल्याणकारी योजनांची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी ग्रामसेवकांच्या दाखल्याची आवश्यकता आहे. कृषी विभागाचा अपवाद वगळता उर्वरीत योजनांसाठी ग्रामसेवकांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक आहे. मात्र, ग्रामसेवक संपावर असल्याने दाखला कसा मिळणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

** गावपातळीवर अशी झाली कामे प्रभावित..

ग्रामसेवक गावात नसल्याने गावपातळीवर कामाचा खोळंबा होत आहे. अनेक गावात पाणी टंचाई आहे. त्यावरील उपाययोजना ठप्प आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, ब्लिचींग पावडर,कृषी विषयक योजना, ऑनलाईन जन्म मृत्युच्या नोंदी, गावपातळीवर खरेदी-विक्रीचे व्यवहार आदी कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. गावातील स्वच्छतेची कामेही प्रभावित झाल्याने घाण निर्माण झाली

** जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांना लागले कुलूप

जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप लागले आहे. ह्यलोकमतह्णने चमूने आज केलेल्या पाहणीत गावोगावी घाणीचे साम्राज्य आढळून आले.