शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी शेतक-यांची तयारी

By admin | Updated: May 18, 2015 01:28 IST

अकोला जिल्ह्यात शेतक-यांकडे ८६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध.

अकोला : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे कमी पडणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या सोयाबीन बियाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तयारी केली आहे. शेतकर्‍यांकडे ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पिके हातून गेली. पिकांचे उत्पादन बुडाल्यासोबतच बिजोत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीसाठी सोयाबीन बियाणे मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होणार आहे. येत्या खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनानुसार,जिल्ह्यातील सातही तालुक्यांत २ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी अपेक्षित आहे. त्यासाठी सोयाबीन पेरणीकरिता एकूण १ लाख ७६ हजार २५0 क्विंटल बियाणे लागणार आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात जिल्ह्यात ८९ हजार ८८८ क्विंटल बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. उर्वरित ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या सोयाबीन बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तयारी केली आहे. या तयारीमध्ये घरी तयार केलेले ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकर्‍यांकडे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे ८६ हजार क्विंटलवर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असल्याने, बाजारात बियाणे कमी उपलब्ध होणार असले तरी कमी पडणारे बियाणे शेतकर्‍यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या निर्माण होणार्‍या टंचाईचा सामना करण्यासाठी शेतकर्‍यांनीच तयारी केल्याचे चित्र आहे.