शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गांवर काम करणा-यांना मिळणार धोक्याची सूचना

By admin | Updated: May 16, 2015 00:46 IST

तीन वर्षात घडले ६५५ अपघात; ३३ रेल्वे कामगारांचा मृत्यू.

राम देशपांडे/ अकोला : मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर या पाचही विभागात रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करीत असताना गत तीन वर्षांत घडलेल्या ६५५ अपघातात ३३ रेल्वे कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, लांबून येणार्‍या गाडीच्या स्पंदनांचा आधार घेत धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा (इलेक्ट्रॉनिक अर्ली वॉर्निंग सिस्टिम - ईईडब्ल्यूएस) मुंबई विभागाने विकसित केली आहे. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात ही यंत्रणा पाचही विभागात कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली. रेल्वे मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष दक्षता घेतली जाते. रेल्वेने नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक, गँगमन व इतर कामगारांच्या चमूद्वारा आवश्यक त्या ठिकाणी वेळ ठरवून रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते. बहुतांश वेळा रेल्वेने प्रवास करीत असताना आपण रेल्वे मार्गांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पाहिले असेल. काम सुरू असलेल्या ठिकाणी दोन कर्मचारी दोन्ही बाजूने येणार्‍या गाड्यांवर लक्ष ठेवण्याकरिता हातात लाल झेंडे घेऊन उभे राहतात. मार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती त्या ठिकाणाहून जाणार्‍या गाडीच्या चालकासदेखील दिली जाते. मात्र, बहुतांश प्रसंगी झेंडे घेऊन उभे राहणारे रेल्वेचे कर्मचारी इंजिन ड्रायव्हरच्या दृष्टीस पडत नाहीत, आणि येथेच घात होतो. गेल्या तीन वर्षांंत मध्य रेल्वेच्या पाचही विभागात असे ६५५ अपघात घडले असून, त्यात ३३ रेल्वे कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर बाबीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबई विभागाने ५00 ग्रॅम वजनाचे उपकरण विकसित केले आहे. अत्यंत कमी वजन असल्याने सहज उचलून नेता येणारे हे उपकरण ज्या ठिकाणी देखभाल-दुरुस् तीचे काम सुरू आहे, त्याठिकाणी लावलं जातं. १२00 मीटरपर्यंत आलेल्या गाडीच्या स्पंदनांचा ठाव घेताच अलार्म वाजतो. केवळ हाताळणीच्याच नव्हे तर खर्चाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत सोयीस्कर असल्याचे मत रेल्वेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.