शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:17 AM

Crowd in Akola Market : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले.

ठळक मुद्देकिराणा दुकानांमध्ये माेठ्या संख्येने ग्राहक असल्याचे दिसून आले. मजूर वर्गाची गावाकडे परत जाण्यासाठी एकच धांदल उडाली हाेती.

अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता राज्य शासनाकडून काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन लागू केले जाणार असल्याची शक्यता मंगळवारी सायंकाळी खरी ठरली. लाॅकडाऊन लागू हाेणार असल्याच्या धास्तीपाेटी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले. यामध्ये किराणा दुकानांमध्ये माेठ्या संख्येने ग्राहक असल्याचे दिसून आले.

काेराेना विषाणूचा वेगाने हाेणारा प्रसार लक्षात घेता २४ मार्च २०२० राेजी केंद्र शासनाने काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून लाॅकडाऊन लागू केले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अचानक लाॅकडाऊनची घाेषणा केल्यामुळे हातावर पाेट असणाऱ्या मजूर वर्गाची गावाकडे परत जाण्यासाठी एकच धांदल उडाली हाेती. दरम्यान, राज्यात काेराेनाचा प्रभाव ओसरत असल्याचे पाहून शासनाने १ जूनपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलाॅक’ला सुरुवात केली हाेती. काेराेना संपण्याची चिन्हं दिसत असतानाच जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समाेर आले आहे. वर्तमानस्थिती लक्षात घेता राज्यात काेराेनाची माेठी लाट आली असून, शासकीय वैद्यकीय यंत्रणा असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाबाधित रुग्णांसाठी खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन व अत्यावश्यक औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला नागरिकांचा गाफीलपणा कारणीभूत ठरला आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केले हाेते. बिकट परिस्थिती लक्षात घेता काेणत्याही क्षण लाॅकडाऊनची घाेषणा हाेण्याची दाट शक्यता गृहीत धरून अकाेलेकरांनी मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र हाेते.

 

बाजारात उसळली गर्दी

राज्य सरकारकडून किमान १५ दिवसांचा लाॅकडाऊन लागू केला जाणार असला तरी यामध्ये वाढ हाेण्याच्या विचारातून सर्वसामान्य नागरिकांनी कडधान्य खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. शहरातील दाणा बाजारात गहू, ज्वारीसह उडीद दाळ, मूग दाळ, हरभरा दाळ, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड हाेती.

 

लाॅकडाऊनची शक्यता गृहीत धरून नाेकरवर्गाने महिनाभर पुरेल इतका किराणा घेतला; परंतु हातावर पाेट असणाऱ्यांनी किमान आठ दिवस पुरेल एवढेच साहित्य खरेदी केले. यावरून नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. शासनाने लाॅकडाऊनच्या निर्बंधातून किराणा दुकानांना वगळल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- राजेश शेळके, व्यावसायिक, किराणा दुकान

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक