शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत समस्यांच्या मुद्यावर काँग्रेसचा हल्लाबोल!

By admin | Updated: November 21, 2014 02:18 IST

महापालिकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची कोंडी; सभा स्थगित

अकोला: एकीकडे शहरात घाण व कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे विविध आजारांची साथ पसरली असून, मूलभूत सुविधांची पुरती दाणादाण उडाली आहे, तर दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून सत्तापक्ष व प्रशासकीय यंत्रणा अकोलेकरांच्या डोळ्य़ात धूळफेक करीत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल केला. या मुद्यावरून सत्तापक्ष व प्रशासनाची झालेली कोंडी, प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची सभेतील अनुपस्थिती लक्षात घेता, काही मोजके प्रस्ताव पारित केल्यानंतर सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी घेतला.सत्तापक्ष भाजप, शिवसेनेच्यावतीने पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन मनपाच्या मुख्य सभागृहात करण्यात आले होते. महापौर उज्ज्वला देशमुख पहिल्याच सभेला ३0 मिनिटांनी उशिरा उपस्थित झाल्या. यावेळी माजी महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासनाकडून प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्यासह उपायुक्त दयानंद चिंचोलीकर सभेला अनुपस्थित असल्याने चर्चा कोणासोबत करणार, असा कळीचा मुद्दा खुद्द शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके यांनी उपस्थित केला. विषय सूचीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वारासाठी निधीच्या तरतुदीच्या मुद्यावरून नगरसेवक सतीश ढगे यांनी प्रशासनासह महापौरांना घरचा आहेर दिला. प्रवेशद्वाराच्या विषयावर केवळ चर्चा होत असून, प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होत नाही. सर्वांच्या मनात प्रवेशद्वार तयार करण्याची इच्छा असेल तरच ठोस निर्णय घ्या, अन्यथा आश्‍वासने बंद करण्याचे परखड मत त्यांनी मांडले. हा धागा पकडून काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, दिलीप देशमुख, साजीद खान, रिजवाना शेख, राकाँचे मो.फजलू पहेलवान यांनी प्रशासन व सत्ताधार्‍यांवर कडाडून हल्लाबोल केला. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले असून, हातपंप बंद आहेत. ज्या भागात जलवाहिनी नाही, त्या भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला असून, पथदिवे, स्वच्छता आदी सुविधा कोलमडल्या आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्याची दुरवस्था झाली असून, काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या निधीतून नियमबाह्यपणे ई-निविदेद्वारे कामे करण्याचा घाट प्रशासनाने रचला. प्रशासनाच्या मनमानीला सत्ताधार्‍यांची साथ असल्याचा आरोप मदन भरगड, साजीद खान यांनी केला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर गोरगरीब लघु व्यावसायिकांचे साहित्य जप्त करून त्यांची तोडफोड करीत आहेत. साफसफाईच्या समस्येला चिंचोलीकर कारणीभूत असल्याने त्यांच्याकडून दोन्ही विभागाचा पदभार काढून घेण्याची मागणी साजीद खान यांनी केली. साजीद खान यांच्या मागणीला भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनीसुद्धा पाठींबा दर्शवला. विविध मुद्यावर गोंधळ झाल्याचे चित्र बघून महापौरांनी विषय सूचीवरील ११ पैकी पाच प्रस्तावांना मान्यता देत, सभा गुंडाळली.