शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

ढगाळ वातावरणामुळे लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:32 IST

वातावरण किडींना पोषक असून, सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

अकोला : मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ व पावसाचे वातावरण असल्याने पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य व (आॅक्सिजन) हवेचा पुरवठा तसेच प्रकाशसंश्लेषणच नाही. परिणामी, पिके पिवळे पडत असून सोयाबीन, कपाशीसह इतर पिके धोक्यात आली आहेत.विदर्भात १७ लाख हेक्टरवर कपाशी व तेवढेच सोयाबीनचे क्षेत्र आहे. इतर पिके मिळून जवळपास ५१ लाख हेक्टर खरीप पिकांखाली आहे. यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणीला उशीर झाला. २३ जून रोजी पहिला पाऊस पडला. या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पावसाने चार आठवडे दडी मारली. २५ जुलैपासून पुन्हा तुरळक पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आजतागायत सुरू असून, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यप्रकाशच नसल्याने पिकांना प्रकाश संश्लेषण होत नसून, पिकांची मुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुरळक स्वरू पाच्या पाऊस पडत असल्याने शेतीची मशागत करणे कठीण झाले. त्यामुळे पिकात तणाचे प्रमाण खूप वाढले आहे. हे वातावरण किडींना पोषक असून, सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

- या उपाययोजना कराव्या!अतिरिक्त पाऊस झाल्यास जमीन संपृक्त होऊन मुळांना प्राणवायू मिळत नाही तसेच अपुरा सूर्यप्रकाश यामुळे प्रकाशसंश्लेषण न झाल्याने पीक पिवळे पडू लागते. अशावेळी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) किंवा १९:१९:१९ हे विद्राव्य खत १ किलो १०० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, पिकात अतिरिक्त पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच करपा, कवडी या रोगाचा आणि उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.मूळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कॉपर आॅक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात झाडांच्या बुंध्याशी आळवणी करावी, चर काढून शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कॉपर आॅक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, असा सल्लाही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला.

- पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडत असल्याने पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य पुरवठा होत नसल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी शक्य असेल तेथे उकरी करू न युरियाचा डोस द्यावा, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तण किडीचे व्यवस्थापन करावे.डॉ. आर. एन. काटकर,सहयोगी संशोधन संचालक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी