शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ढगाळ वातावरणामुळे लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:32 IST

वातावरण किडींना पोषक असून, सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

अकोला : मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ व पावसाचे वातावरण असल्याने पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य व (आॅक्सिजन) हवेचा पुरवठा तसेच प्रकाशसंश्लेषणच नाही. परिणामी, पिके पिवळे पडत असून सोयाबीन, कपाशीसह इतर पिके धोक्यात आली आहेत.विदर्भात १७ लाख हेक्टरवर कपाशी व तेवढेच सोयाबीनचे क्षेत्र आहे. इतर पिके मिळून जवळपास ५१ लाख हेक्टर खरीप पिकांखाली आहे. यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणीला उशीर झाला. २३ जून रोजी पहिला पाऊस पडला. या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पावसाने चार आठवडे दडी मारली. २५ जुलैपासून पुन्हा तुरळक पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आजतागायत सुरू असून, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यप्रकाशच नसल्याने पिकांना प्रकाश संश्लेषण होत नसून, पिकांची मुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुरळक स्वरू पाच्या पाऊस पडत असल्याने शेतीची मशागत करणे कठीण झाले. त्यामुळे पिकात तणाचे प्रमाण खूप वाढले आहे. हे वातावरण किडींना पोषक असून, सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

- या उपाययोजना कराव्या!अतिरिक्त पाऊस झाल्यास जमीन संपृक्त होऊन मुळांना प्राणवायू मिळत नाही तसेच अपुरा सूर्यप्रकाश यामुळे प्रकाशसंश्लेषण न झाल्याने पीक पिवळे पडू लागते. अशावेळी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) किंवा १९:१९:१९ हे विद्राव्य खत १ किलो १०० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, पिकात अतिरिक्त पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच करपा, कवडी या रोगाचा आणि उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.मूळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कॉपर आॅक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात झाडांच्या बुंध्याशी आळवणी करावी, चर काढून शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कॉपर आॅक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, असा सल्लाही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला.

- पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडत असल्याने पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य पुरवठा होत नसल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी शक्य असेल तेथे उकरी करू न युरियाचा डोस द्यावा, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तण किडीचे व्यवस्थापन करावे.डॉ. आर. एन. काटकर,सहयोगी संशोधन संचालक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी