शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Video : आम्हाला पण पर्याय नाही! म्हणत त्रस्त शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 5:22 PM

Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही. 

ठळक मुद्दे  शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पाणी साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत.

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं असं म्हणत त्याने हताश होऊन व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्यातुन गळणारे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याला स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही.  शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पाणी साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत. त्यातून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चव्हाण यांचं गाऱ्हाणं आहे. त्यांनी जलसंपदा विभागाला यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, चारीतून चुकीच्या पद्धतीने पाणी सोडले जाते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून माझ्या शेतात पाणी साठते. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे आपल्या शेतात पाणी साठते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. 

उन्हाळ्यात माशगत करून पुढील पिकासाठी शेत तयार केले की, हे पाणी येते. बराच काळ हे पाणी साठून राहत असल्याने आपले मोठे नुकसान होते. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे. शिर्डीजवळ चारीत बिघाड झाला आहे. चव्हाण यांनी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात नाही. दरवर्षी मेहनत करून शेत तयार करायचे आणि नंतर पाणी आल्यावर नुकसान सहन करायचे, असा प्रकार सतत सुरू आहे. एकदा पाणी साठले की पुढील तीन-चार महिने हे पाणी साठून राहते. पावसाळ्यात समजू शकतो, मात्र उन्हाळ्यातही एखाद्या तळ्याप्रमाणे शेतात पाणी साठून राहत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,' अस त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारच शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतो असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

धरणातून जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा माझ्या शेतात पाणी साचते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जलसंपदा विभाग व तहसीलदार यांना २०१७ पासून तक्रारी करत आहे. मात्र काहीच दखल घेतली गेली नाही. मंगळवारी जलसंपदा विभागातील काही कर्मचारी शेतात आले होते. उपाययोजना करतो असे त्यांनी सांगितले मात्र अजूनतरी काहीच त्यांनी केलेले नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. - बापू चव्हाण, शेतकरी, धारणगाव ता. कोपरगाव

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरshirdiशिर्डीfarmer suicideशेतकरी आत्महत्याIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGovernmentसरकार