शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

साडेतीन लाख शेतकरी कृषी संजीवनीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:44 PM

कृषीपंपाच्या थकीत बिलावरील व्याज व दंड यात सवलत देऊन वीजबिलाची मूळ रक्कम वसूल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषिपंपधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतक-यांना महावितरणकडून नवीन स्वरूपातील वीजबिलाचे वाटप सुरू करण्यात आले असून १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनानवीन वीजबिले वाटपास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कृषीपंपाच्या थकीत बिलावरील व्याज व दंड यात सवलत देऊन वीजबिलाची मूळ रक्कम वसूल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषिपंपधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतक-यांना महावितरणकडून नवीन स्वरूपातील वीजबिलाचे वाटप सुरू करण्यात आले असून १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६२६ शेतक-यांकडे १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रकमेची वीजबिले थकीत आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी बिलामध्ये थकीत रकमेचे सुलभ हप्ते, भरावयाची रक्कम व कालावधी देण्यात आला आहे. तसेच योजनेची ठळक वैशिष्ट्य व योजनेत सहभाग घेऊन नियमितपणे हप्ते भरल्यास नेमके किती व्याज व दंड माफ करण्यात येईल, याचीही माहिती बिलात देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे थकबाकी आहे. अहमदनगर मंडलात ३० हजारपेक्षा अधिक थकबाकी असणारे १ लाख ९६ हजार ५६२ ग्राहक आहेत, त्यांच्याकडे १ हजार ५८ कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ३० हजारपेक्षा कमी रकमेची बिले थकीत असलेले १ लाख ६० हजार ६४ ग्राहक आहेत, त्यांच्याकडे २८१ कोटी रुपये थकीत आहेत. ३० हजारपेक्षा अधिक थकबाकी शेतक-यांना समान दहा भाग करून देण्यात आले आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत हि रक्कम सामान दहा हप्त्यात भरावी लागणार आहे. ३० हजारपेक्षा कमी थकबाकी असलेल्या कृषिपंप ग्राहकांना पाच समान हप्ते करून देण्यात आले असून दर तीन महिन्यांनी ते नियमित भरणे अनिवार्य आहे.एकूण थकबाकीदार : ३ लाख ५६ हजार ६२६एकूण मूळ थकबाकी : १ हजार ३३८ कोटी रुपये३० हजारपेक्षा कमी रकमेची थकीत ग्राहक : १ लाख ६० हजार, थकीत रक्कम : २८१ कोटी३० हजारपेक्षा अधिक थकबाकी ग्राहक : १ लाख ९६ हजार ५६२, थकीत रक्कम १ हजार ५८ कोटी रुपये