शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

'तो' मदतीची याचना करत होता अन् लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 11:50 AM

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला.

ठळक मुद्देशुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. कार थांबवून लोकांनी द्राक्षांचे कॅरेटचे कॅरेट भरून नेले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सोमेश शिंदे

अहमदनगर - अपघात झाला की अपघातग्रस्तांना मदत करायचे सोडून त्यांच्या वस्तू पळवणे, चोरी करणे यासारख्या घटनांमुळे माणुसकी आता नावापुरतीच उरली आहे. नगर-दौंड महामार्गावरील अपघातावेळी याचा प्रत्यय आला. चालक, मदतीची याचना करत असतानाही रस्त्यावरील हावराटांनी द्राक्षांचा ट्रक लुटल्याची घटना समोर आली आहे. 

शुक्रवारी (१ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक (क्रमांक यु.पी ७२, टी ७१३५ ) महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. माणुसकीचा कुठलाही लवलेश न ठेवता पलटलेल्या ट्रकवर जनतेने अक्षरश: उडी घेतली. हातात मावेल तेवढी द्राक्षे लोकांनी पळवली. लोकांचा जमाव पाहता ट्रक चालकाने हाता पाया-पडत जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या विनवणीचा लोकांवर कुठलाच परिणाम होत नव्हता.

विशेष म्हणजे काही लोकांनी पोत्यांमध्ये भरून तर काहींनी स्वत:च्या अंगातील शर्ट काढून त्यात द्राक्षे भरून नेली. काही लोक गाड्या द्राक्षे पळवण्यासाठी थांबत होते. रस्त्यावरून जाताना कार थांबवून लोकांनी द्राक्षांचे कॅरेटचे कॅरेट भरून नेले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ट्रकच्या रांगा त्यात द्राक्षे लुटण्यासाठी झालेली झुंबड यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता. नागरिकांनी माणुसकी शून्य भावनेचे दाखविलेले दर्शन लक्षात घेता माणसातील विकृती किती वाढली आहे याचाच हा प्रत्यय म्हणावा लागेल.

द्राक्षांचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. पाऊस कमी पडल्याने द्राक्षांचे भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असून चांगल्या प्रतिचे द्राक्षे १०० रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र नगर दौंड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरातील लोकांना फुकट द्राक्षे खाण्याची आयतीच संधी मिळाली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात