शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

51 गोणी कांदा विकून 6 रुपये मिळाले, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 3:11 PM

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१ गोणी कांदा विकून ६ रुपये शिल्लक मिळाल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी श्रेयश संजय आभाळे यांनी ही रक्कम थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरद्वारे पाठवत सरकारचा निषेध केला.

घारगाव : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५१ गोणी कांदा विकून ६ रुपये शिल्लक मिळाल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी श्रेयश संजय आभाळे यांनी ही रक्कम थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरद्वारे पाठवत सरकारचा निषेध केला.श्रेयश संजय आभाळे हे तालुक्यातील अकलापूर येथील शेतकरी असून त्यांनी दोन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असल्याने ठिबक सिंचन करून कांदा पिकवला.मात्र,गुरुवारी त्यांनी संगमनेर बाजार समितीत त्यातील ५१ गोण्या कांदा ( २ हजार ६५७ किलो) विक्रीसाठी पाठवला असता अवघे सहा रुपये शिल्लक राहिल्याने त्यांनी सरकारचा निषेध म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही रक्कम मनीआॅर्डर केली.संगमनेर बाजार समितीतील आडतदाराकडे ०६ डिसेंबर रोजी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे तीन वेगवेगळे वक्कल होते. त्याचे एकूण वजन २ हजार ६५७ किलो इतके भरले.हे घ्या हिशोब७९५ किलो : प्रति किलोस २ रुपये ५१ पैसे६८ किलो : प्रति किलोस ७५ पैसे१ हजार ५९४ किलो : प्रतिकिलो ६३ पैसेएकूण रक्कम ३ हजार २०८ रुपये ६५ पैसेहमाली - १३९ रुपये ९० पैसेतोलाई - १०१ रुपये ७५ पैसेवाराई - ५१ रुपयेमोटार भाडे - २ हजार ९१० रुपयेएकूण खर्च -३ हजार २०२३ हजार २०८ रुपये ६५ पैसेवजा३ हजार २०२बाकी - ०६ रुपये फक्त

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरonionकांदाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र