शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; लाखो हेक्टरवरील पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST

अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज यंदाही चुकल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने ...

अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज यंदाही चुकल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आगामी आठवडाभर पाऊस न झाल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.

यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रातच जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र त्यानंतर मागील जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात बाजरी, तूर, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन अशी पिके प्रामुख्याने घेतली जातात. यंदाही शेतकऱ्यांनी याच पिकांना प्राधान्य दिले. उडदाची तर उच्चांकी पेरणी झाली. आतापर्यंत कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ९६ हेक्टर क्षेत्रावर वेगवेगळ्या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या ३१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

-----

तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस..

तालुका पेरणी (हेक्टरमध्ये) झालेला पाऊस (मिमी)

नगर १९७७५ ११४

पारनेर २१४०५ ९५

श्रीगोंदा ८०९८ १७०

कर्जत ४४७६२ १०६

जामखेड ३०५१० ७०

शेवगाव ४४११ १०६

पाथर्डी ५३१० ८४

नेवासा १०१०९ ५८

राहुरी १७१६ ६६

संगमनेर २४०० ५४

अकोले ९७८३ १२९

कोपरगाव २९७४ ६४

श्रीरामपूर १९७ ५३

राहाता ८०८ ४५

------

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

५५००४१ (अपेक्षित पेरणी क्षेत्र)

१६०८२७ (आतापर्यंत झालेली पेरणी)

-----------

पावसाची स्थिती (मिमी)

अपेक्षित पाऊस (८३)

झालेला पाऊस (९०)

-----

सर्वात जास्त पाऊस मिमी

श्रीगोंदा तालुका

सर्वात कमी पाऊस मिमी

राहाता तालुका

-------------

पीकनिहाय क्षेत्र

झालेली पेरणी अपेक्षित पेरणी

भात : १६०९ १४०३६

बाजरी : १८८२५ १४०८९२

तूर : १३१७९ १५१२१

मूग : २१९१६ ४०३७८

उडीद : ५०७०४ १७५९६

सोयाबीन : १०९४३ ५४२९४

कापूस : १२९९४ ११४३५२

-------------------

गेल्यावर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस झाला होता. तसाच यंदाही सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख तूर, मुगाची या भागात मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. पिकेही जोमात आली; मात्र नंतर पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.

-शिवाजी शेळके,

शेतकरी, नगर

---------

आम्ही प्रामुख्याने बाजरी, कापूस अशी खरीप हंगामात पिके घेतो. गेल्यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर पिके काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा तर पेरणी झाल्यानंतरच पावसाने दडी मारल्याने पुढे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यासाठी हवामान विभागाने योग्य अंदाज वर्तविणे गरजे आहे.

चंद्रभान फटांगरे,

शेतकरी, भातकुडगाव, ता. शेवगाव