शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बांगर्डेतील आदिवासी वस्तीत पायाभूत सुविधांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील बांगर्डे शिवारातील रखरखत्या माळरानावर तीन ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजातील १० ते १२ कुटुंबांनी पाले ठोकली आहेत. ...

श्रीगोंदा : तालुक्यातील बांगर्डे शिवारातील रखरखत्या माळरानावर तीन ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजातील १० ते १२ कुटुंबांनी पाले ठोकली आहेत. ऊस तोडणी मजुरीते ते काम करतात. या कामातून त्यांनी अनेकांच्या जीवनात गोडवा निर्माण केला. पोलिसांना विविध गुन्ह्यांचा तपास करताना मदतही केली. मात्र ४० वर्षांनंतरही भिल्ल वस्तीत नागरी सुविधा आणि कौटुंबिक प्रगतीचा अरुणोदय झालेला नाही. येथील कुटुंबांना अद्यापही पायाभूत सुविधांची प्रतीक्षा आहे.

पूर्वी श्रीगोंद्याची दुष्काळ तालुका अशी ओळख होती. काळाच्या ओघात सिंचन क्रांती झाल्याने तालुक्याचे चित्र बदलले. मात्र दुष्काळी भागातील बांगर्डे येथील भिल्ल वस्तीतील नागरिकांना ना जातीचे दाखले, ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड, ना बँकेचे पासबूक, ना विजेचा दिवा अशी अवस्था आहे. त्यामुळे कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत नाही. गावागावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आरओ सिस्टिम सुरू झाल्या आहेत. मात्र भिल्ल वस्तीत साधा हातपंपही नाही.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यावर ते ऊस तोडणी करत आहेत. जंगल नष्ट झाल्याने शिकारीही बंद झाल्या. अशा परिस्थितीत येथील एकलव्य हे चोरीच्या ठिकाणी माग काढून चोर पकडून देण्यास मदत करतात. बांगर्डेच्या सरपंच अश्विनी खोटे व माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड यांच्या मदतीने या भिल्ल वस्तीतील व्यथा समोर आल्या.

-----आधार कार्ड, रेशनकार्ड नसल्याने आम्ही भारतीय नागरिक आहोत की नाही हेच समजत नाही. आम्हाला कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही, असे आम्ही काय पाप केले.

-भानुदास बर्डे,

ग्रामस्थ, बांगर्डे, ता. श्रीगोंदा

----

भिल्ल वस्तीतील नागरिकांकडे जातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांना ना घरकूल ना रस्ता देता येत. अगोदर महसूल विभागाने त्यांना दाखले द्यावेत. त्यानंतर त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होईल.

-अश्विनी खोटे,

सरपंच, बांगर्डे

----

१२ बांगर्डे

बांगर्डे येथील पालात राहणारे भिल्ल समाजातील कुटुंबीय.