शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिघाडी, वाॅर्डात बिघाडी; इच्छुकांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST

अहमदनगर : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचना लागू केल्याने अहमदनगर शहरातील वाॅर्डरचना पुन्हा बदलणार आहे. सध्या चार ...

अहमदनगर : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचना लागू केल्याने अहमदनगर शहरातील वाॅर्डरचना पुन्हा बदलणार आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग आहे. नव्या रचनेत १७ ऐवजी २३ प्रभाग होतील. यामुळे इच्छुक उमेदवारांची झोप उडाली असून, त्यांच्या निवडणूक तयारीवरही पाणी फिरले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. अहमदनगर महापालिकेची पहिली निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार घेण्यात आली होती. त्यानंतर २००८ मध्ये एक सदस्यीय, सन २०१३ मध्ये दाेन सदस्यीय आणि सध्या चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. महापालिकेची पहिली निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार झाली हाेती. आता पुन्हा तीच प्रभाग पद्धती लागू होणार आहे. सध्याच्या नगरसेवकांनी एकमेकांशी साटेलोटे करीत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र त्रिसदस्यीय प्रभागरचना लागू झाल्याने त्यांना आता नवी राजकीय समीकरणे जुळवावी लागतील.

...

महापालिकेची सध्याची परिस्थिती

महापालिकेची निवडणूक सन २०१८ मध्ये झालेली आहे. सध्या १७ प्रभाग असून, या प्रभागातून प्रत्येकी चार, याप्रमाणे ६८ नगरसेवक निवडून आलेले आहेत. साधारण १५ ते २० हजार मतदारांचा एक प्रभाग आहे.

...

अशी असेल महापालिकेची स्थिती

शासनाच्या नव्या नियमामुळे सध्याच्या १७ वाॅर्डऐवजी २३ वाॅर्ड हाेतील. नगरसेवकांच्या संख्येत १ ते ५ पर्यंत बदल होऊ शकतात. साधारण वाॅर्ड १५ ते १८ हजार मतदारांचे असतील. त्यात आरक्षित व खुल्या जागेनुसार प्रभागांची रचना करावी लागणार आहे.

.....

एका मतदारास करावे लागणार तिघांना मतदान

तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका मतदाराला चार उमेदवारांना मते द्यावी लागली होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका होत्या. आता चारऐवजी तिघांना मतदान करावे लागणार आहे. यापूर्वी शहरातील मतदारांनी तीन, एक, दोन आणि चार जणांना मतदान केलेले आहे.

................

शहराच्या विकासाला बसणार खीळ

सध्याच्या चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रभागाची लांबी, रुंदी मोठी आहे. काही प्रभागात एकाच परिसरात तीन-चार नगरसेवक आहेत. ते केवळ त्या परिसरातच कामे करतात. त्यामुळे शहराच्या समतोल विकासाला खीळ बसली असून, पुढील निवडणुकीत असेच चित्र पहायला मिळेल.

....

तीन प्रभाग सदस्य रचनेला काँग्रेसने पक्षस्तरावर राज्यपातळीवर विरोध केला आहे. काल तसा ठराव मुंबईतील बैठकीत करण्यात आला आहे. दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी पक्षाची मागणी आहे. दोन सदस्यांचा प्रभाग झाल्यास स्वागतच आहे.

-किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

......

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. त्रिसदस्यीय प्रभागरचना झाली तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून महापालिका ताब्यात घेईल.

-दिलीप सातपुते, शहरप्रमुख, शिवसेना

.....

राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जरी शासनाने एक किंवा दोन सदस्यीय प्रभागरचना केली असती तरी त्याचे आम्ही स्वागतच केले असते. प्रभागाचा विकास हेच पक्षाचे धोरण आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांचाही या प्रभागरचनेला पाठिंबा आहे.

- माणिक विधाते, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस