शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने सुरूच होऊ देणार नाही

By admin | Updated: September 7, 2014 23:47 IST

अहमदनगर : तीन महिन्यांपासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन बेमुदत संपावर आहे. मात्र, राज्य सरकार कामगारांसोबत वाटाघाटी करण्यास तयार नाही.

अहमदनगर : तीन महिन्यांपासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन बेमुदत संपावर आहे. मात्र, राज्य सरकार कामगारांसोबत वाटाघाटी करण्यास तयार नाही. यामुळे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. सरकार जरी साखर कारखाने सुरू करण्याची घोषणा करत असले तरी कामगार युनियन कारखाने सुरूच होऊ देणार नसल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी दिला.६५ वर्षापासून ज्या साखर कामगारांच्या जीवावर कारखानदारी उभी आहे, त्यांच्याकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे कामगारांचा प्रश्न चिघळला आहे. सरकार ऊस तोडणी हार्वेस्टरसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देत आहे, मात्र, कामगारांचा १०० रुपयांचा विमा काढत नाही. हार्वेस्टरला ४०० रुपये प्रती टन तर कामगारांना १९० रूपये प्रती टन प्रमाणे पैसे देत आहेत. राज्यातील ऊस तोडणी कामगार तीन महिन्यांपासून संपावर आहेत. मात्र, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. सहकार मंत्री कारखाने सुरू करण्याची तारीख घोषित करत आहेत. मात्र, ऊस तोडणी कामगारच कारखाना सुरू करावयाचा की नाही, हे ठरविणार असल्याचे थोरे यांनी सांगितले आहे.ऊस तोडणी कामगार युनियनचे राज्यभर १५ ते १६ लाख सभासद असून ते तीन महिन्यांपासून काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सरकार अद्यापही चर्चेच्या तयारीत नसून यामुळे कारखाने आणि युनियनमध्ये करार होऊ शकलेला नसल्याचा आरोप थोरे यांनी केलेला आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांकडून राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऊस तोडणी कामगार उन्नती प्रकल्प राज्यभर राबविण्याची मागणी युनियनचे अध्यक्ष थोरे यांनी केली आहे. तसेच शासनाने कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.