शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दुकाने सुरू ठेवण्याची सकाळी सात ते दुपारी चार ही वेळ असली तरी नगर शहरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : दुकाने सुरू ठेवण्याची सकाळी सात ते दुपारी चार ही वेळ असली तरी नगर शहरात चारनंतरही अनेक दुकाने उघडीच असतात, चहा, खाद्यापदार्थ्यांचे गाडे, दुकानेही सर्रास सुरू असतात. शनिवारी, रविवारी दुकाने पूर्ण बंद असली तरी अर्धवट शटर ठेवून नगर शहरात अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसले. हॉटेल तर बाहेरून बंद आणि आतून सुरूच असल्याचे दिसले.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. राज्यात सगळीकडे निर्बंध स्तर-३ चे नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ या काळातच दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी पाचनंतर पूर्णपणे संचारबंदी लागू आहे. शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन आहे. मात्र नगर शहरात निर्बंध लागू आहेत की नाही, अशीच स्थिती पहायला मिळाली. संचारबंदी तर कुठेच दिसत नाही. दुपारी चारनंतर किराणा दुकाने, दूध विक्री, बेकरी, खाद्य पदार्थ्यांची दुकाने सुरूच असतात. हॉटेलही रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात. त्यामुळे नियम आहेत की नाही? याचीच शंका येते.

---------------

या दुकानांवर लक्ष कोणाचे?

नगर शहरात दुपारी चारनंतर अनेक दुकाने उघडी असतात. ज्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे, ते पोलीस, महापालिका प्रशासन मात्र नियमांचे पालन होते की नाही, हे देखील पहायला रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. महापालिकेचे दक्षता पथक शहरात फिरते मात्र किरकोळ कारवाई करून ते पुढे जाते. त्यामुळे चहाची दुकाने, खाद्य पदार्थ्यांची स्टॉल रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात.

-------------

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिक गर्दी करीत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे.

-शंकर गोरे, आयुक्त, महानगरपालिका

-------------

शटर बंद...व्यवसाय सुरू

बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक आदी ठिकाणी शटर अर्धवट ठेवून व्यवसाय केला जात आहे. डेअरीची दुकाने तर दुपारी चारनंतर तसेच शनिवारी, रविवारीही शटर बंद ठेवून सुरूच असतात. मध्य नगर भागात, गुलमोहोर रोडवरही रविवारी अशी दुकाने उघडी असल्याचे दिसले.

----------------

कोरोना हवा की जेवण ?

अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना नगरमध्ये दुपारी चार वाजता बंद होणे अपेक्षित आहे. मात्र ती रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र नगर शहरात पहायला मिळत आहे. महामार्गावरील हॉटेल, दुकाने, चहाची दुकाने, टपरी, भाजीविक्री, किराणा दुकानेही सायंकाळनंतर उघडी असतात. खासगी आस्थापनाही शटर उघडे ठेवून काम करीत असल्याचे दिसून आले.

----------

कोरोना काळात मनपाने वसूल केलेला दंड

पहिल्या लाटेनंतर-२,५०,०००

दुसऱ्या लाटेनंतर- ६,६३,७००

--------------------