शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

विविध मार्गांवर धावताहेत शिवशाही बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, तारकपूर आणि जामखेड या पाच आगारांमध्ये एकूण २२ शिवशाही ...

संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, तारकपूर आणि जामखेड या पाच आगारांमध्ये एकूण २२ शिवशाही बसेस आहेत. या वातानुकूलित बसमधून प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून विविध मार्गांवर शिवशाही बसेस धावत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ११ आगार आहेत. परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील चारशे बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले. यात वातानुकूलित शिवशाही बसेसचादेखील समावेश आहे. विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेल्या केमिकल कोटिंगमुळे प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते आहे.

कोरोनामुळे परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. प्रवासी संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक आगारांतील बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. प्रवासी संख्या वाढत असल्याने बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू करण्यात आली. शिवशाही बसेसच्या फेऱ्यादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात प्रवासी संख्या वाढल्यानंतर शिवशाही व इतर बसेसच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या संगमनेर-पुणे, कोपरगाव-पुणे, श्रीरामपूर-पुणे, तारकपूर-कल्याण, तारकपूर-पुणे या मार्गांवर शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. कोपरगाव-पुणे ही शिवशाही बस संगमनेर मार्गे पुण्याला जाते.

---------------

सध्या सुरू असलेल्या शिवशाही

संगमनेर-पुणे

कोपरगाव-पुणे

श्रीरामपूर-पुणे

तारकपूर-कल्याण

तारकपूर-पुणे

-------------

ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग

संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, तारकपूर आणि जामखेड या पाच आगारांमध्ये एकूण २२ शिवशाही बसेस आहेत. या सर्वच बसेसना ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे.

----------

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच बसेसला दर दोन महिन्यांनी ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केले जाणार आहे. शिवशाही बसने प्रवास करण्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रवाशांनी करणे बंधनकारक आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येतील.

विजय गीते, विभाग नियंत्रक, अहमदनगर विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

................

star 1137