शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१९ कारखान्यांचे गाळपासाठी प्रस्ताव

By admin | Updated: September 30, 2014 23:21 IST

अहमदनगर : दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २० ते २५ टक्के ऊस संपला आहे.

अहमदनगर : दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २० ते २५ टक्के ऊस संपला आहे. याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता असली तरी शंभर लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, १९ कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी सहसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून शंभर लाख मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. साधारण जानेवारी ते मार्च २०१३ या दरम्यान झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका शेतात उभ्या असणाऱ्या उसाला बसला. यामुळे उपलब्ध उसापैकी सुमारे २० ते २५ टक्के ऊस संपला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. यंदा परिस्थिती विपरीत होती. जुलै महिन्यापर्यंत चाऱ्यासाठी उसाचा वापर करण्यात आला. यामुळे सर्व कारख्यान्यांच्या कार्यक्षेत्रात कमी अधिक उभ्या उसाचे क्षेत्र घटले आहे. याचा परिणाम गाळपावर होणार आहे. अशा परिस्थितीत शंभर मेट्रीक टन गाळप होईल असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. १९ कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यातून १२ प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्यांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात साधारण १५ आॅक्टोबरपर्यंत सर्व कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहेत. (प्रतिनिधी)