केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मार्केट कमिट्या संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:00+5:302021-07-12T04:15:00+5:30
वडगाव पान येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारमध्ये रविवारी (दि. ११) शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते ...

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मार्केट कमिट्या संकटात
वडगाव पान येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारमध्ये रविवारी (दि. ११) शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रकिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, नाशिक येथील शिवसेना नेते विजय आप्पा करंजकर, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतीष गुंजाळ, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, पंचायत समिती सदस्या सुनंदा जोर्वेकर यांसह लक्ष्मण कुटे, बेबी थोरात, पद्मा थोरात, बाळासाहेब गायकवाड, श्रीनाथ थोरात, दत्तात्रय थोरात, आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या समित्यांसह शेतकरी अडचणीत आला आहे. मागील सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला केंद्र सरकार दाद देत नाही. केंद्राने केलेले काळे कृषी कायदे रद्द होण्याकरिता काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठविला आहे. महाविकास आघाडी सरकारने या कायद्यांमध्ये दुरुस्तीसाठी विधानसभेत विधेयक मांडले आहे. यात शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य माणूस या सर्वांच्या सूचना विचारात घेऊन नवा कृषी कायदा तयार होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.