मोलमजुरांचे जगणे झाले अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:56+5:302021-04-16T04:19:56+5:30
एक वर्षापासून सुरू असणारा कोरोना सर्वसामान्यांना डोके वर काढू देईना. सलूनवाले, भाजीपाला विक्रेते, छोटे चहा नाश्त्याचे सेंटर यांना ...

मोलमजुरांचे जगणे झाले अवघड
एक वर्षापासून सुरू असणारा कोरोना सर्वसामान्यांना डोके वर काढू देईना. सलूनवाले, भाजीपाला विक्रेते, छोटे चहा नाश्त्याचे सेंटर यांना दुकानाचे भाडे भरणे अवघड झाले आहे. नेहमीच्या बंदमुळे नैराश्यजन्य स्थिती ग्रामीण भागात दिसत आहे. काही दुकानदारांना बंद म्हणजे, एक पर्वणीच ठरत असते. या काळात चढ्या भावाने माल विकत घ्यावा लागतो. मजुरी बंद असल्यामुळे करायचे काय? त्यात रोजचा खर्च सुरूच असतो. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये चिंतेचे काहूर माजले आहे.
शासनाची मदत गहू, तांदूळ मिळेल. एक किलो तेल घेण्यासाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलच्या दरवाढीत गोडतेल कधी वाढले, हे कळलेच नाही. प्रप्रंचाची गाडी पुढे ढकलावी कशी, अशी चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने खाद्यतेल व इतर बाजारभाव स्थिर ठेवले पाहिजेत. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु, प्रप्रंचाचा रहाटगाडा चालवायचा कसा, असा प्रश्नही अनुत्तरीत आहे.