शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून शिक्षक बँकेच्या विस्तारीकरणाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST

अहमदनगर : शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी करण्याचा घाट घातला असून, येत्या रविवारी होणाऱ्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत यासाठी ...

अहमदनगर : शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी करण्याचा घाट घातला असून, येत्या रविवारी होणाऱ्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत यासाठी पोटनियम दुरुस्तीचा विषय ठेवला आहे. असे झाले तर बँकेचा कारभार राज्य संघटनेच्या हाती जाईल. त्यातून कर्जवसुलीचा गंभीर प्रश्न उभा राहून बँकेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे या निर्णयाला प्राथमिक शिक्षक गुरुकुल मंडळासह शिक्षक संघटना समन्वय समितीने विरोध दर्शवला आहे. सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला तरी त्यांचा भ्रष्टाचार सुरूच असल्याची टीका विरोधी मंडळांनी केली.

शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. त्याला विरोध करण्यासाठी बुधवारी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती व गुरुकुल मंडळाने स्वतंत्र्य पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर म्हणाले की, नगर जिल्ह्यातील शिक्षकांची मंडळे राज्य संघटनेशी जोडलेली आहेत. शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्यव्यापी केल्यास बँकेचा कारभार राज्य संघटनेच्या हाती जाईल. जिल्ह्यातच कर्जवसुलीचा प्रश्न असताना राज्यातून कर्जवसुली कशी करायची. हा निर्णय झाला तर बँकेचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाला गुरुकुल पूर्ण ताकदीनिशी विरोध करील. २८ मार्च रोजी बँकेची सर्वसाधारण सभा ॲानलाईन आयोजित केली? आहे. त्यामुळे सभागृह खर्च, अहवाल खर्च, सभासदांना भोजन असा मोठा खर्च वाचणार असतानाही या सभेसाठी नऊ लाखांची तरतूद कशासाठी केली? वारंवार मागणी करूनही सदोष साॅफ्टवेअर प्रणालीमुळे प्रत्येक सभासदाला चक्रवाढ व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, असे आरोप कळमकर यांनी केले. यावेळी सीताराम सावंत, अण्णासाहेब आंधळे, किरण दहातोंडे, संजय नळे, आदी उपस्थित होते.

------------

प्रशासक नेमण्याची मागणी

समन्वय समितीच्या पत्रकार परिषदेस शिक्षक संघाचे शिवाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्राथमिक शिक्षक संघाचे आबासाहेब जगताप, किसन बोरूडे, शिक्षक परिषदेचे संजय शिंदे, आबा लोंढे, एकनाथ व्यवहारे, एल. पी. नरसाळे, अप्पासाहेब बेरड, प्रवीण ठुबे, नारायण राऊत, आदी उपस्थित होते. राजेंद्र शिंदे म्हणाले की, बँकेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपलेला असल्याने बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे. बँकेने शताब्दी निधीच्या नावाखाली १ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातून प्रत्येक सभासदाला लाभ मिळणे आवश्यक असताना काही ठरावीक सभासदांसाठी कार्यक्रम घेऊन त्यातील १० लाखांच्या रकमेची उधळपट्टी केली. बँकेने शुभमंगल भेट योजना आणली. पती-पत्नी दोघेही सभासद असतील तर दोघांनाही योजनेचा लाभ दिला जावा. परंतु सत्ताधारी एकालाच याचा लाभ देत आहेत, जे चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांचा घड्याळ घोटाळा तर राज्यात गाजतो आहे. त्याची चौकशी सुरू आहे. संचालकांची मुदत संपल्यावर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. असे असतानाही त्यांनी श्रीगोंदा व पाथर्डी शाखांच्या नूतनीकरणावर लाखो रुपये खर्च केला, असा आरोप समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

-------------