शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंटलाइन वर्करचा आरोग्य विमा ग्रामपंचायतीने उतरवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ...

अहमदनगर : ग्रामपंचायत स्तरावर सध्या अंगणवाडीसेविका, आशासेविका तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा, अशी मागणी भाजपचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे जोखमीचे काम अंगणवाडीसेविका (४६३९), मिनीअंगणवाडीसेविका (६४०), मदतनीस (४२५६), आशावर्कर (३१८२), आशा गटप्रवर्तक (१७०), आशा तालुका समूहसंघटक (१४), ग्रामपंचायत कर्मचारी (२७७४) असे मिळून १५६७५ कर्मचारी करत आहेत. हे सर्व कर्मचारी तुटपुंज्या पगारावर कार्यरत आहेत. कमी पगार असूनही केवळ कुटुंबप्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी असल्याने हे सर्व कार्यरत आहेत. कोरोना लागण झाल्यास साध्या औषधोपचाराचीही परिस्थिती यांची नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा उपचार खर्च हे कसे पेलतील? जिल्हा परिषदेच्या इतर अधिकारी किंवा कर्मचा-यांची आणि त्यांच्या कुटुंबाचीदेखील औषधोपचाराची जबाबदारी सरकार स्वीकारते. किंबहुना, त्यांना याबाबतचे पूर्ण संरक्षण सरकारकडून दिले जाते. परंतु वरील १५६७५ कर्मचाऱ्यांना असा कोणताही आधार नाही. त्यामुळे अशा सर्व कर्मचा-यांना संबंधित ग्रामपंचायतीकडून आरोग्य विम्याचे संरक्षण मिळाल्यास त्यांच्यासाठी मोठा आधार निर्माण होईल. संबंधित कर्मचाऱ्यांचा एक वर्षभराचा जरी ग्रामपंचायतीने आरोग्य विमा उतरविला, तरी फार खर्च येणार नाही. म्हणून आपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या सर्व कर्मचाऱ्यांना विमासंरक्षण द्यावे म्हणून आदेश काढण्याची गरज आहे, असे वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले आहे.