शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

हे तर पोलिसांचे अपयश; ७५टक्के आरोपी सुटतात निर्दोष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST

अहमदनगर : गेल्या काही वर्षांत गंभीर गुन्ह्यात दोष सिद्धतेचे प्रमाण घटले असून पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष सुटून समाजात उजळ माथ्याने ...

अहमदनगर : गेल्या काही वर्षांत गंभीर गुन्ह्यात दोष सिद्धतेचे प्रमाण घटले असून पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष सुटून समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत. हे पोलीस आणि सरकारी पक्षाचे अपयश आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा सत्र न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यात दोष सिद्धतेचे अवघे ३५ टक्के प्रमाण असल्याचे आकडेवारी सांगते. इतर गुन्ह्यातील प्रमाण तर यापेक्षाही कमी आहे.

गुन्हा घडल्यानंतर सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे आणि सरकारी वकिलाच्या मदतीने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणे. हे संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकाऱ्याचे काम असते. पोलिसांनी दोषारोपपत्रात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील फिर्यादीची बाजू मांडत असतात. मात्र तपासात त्रुटी, अपेक्षित पुरावे सादर न करणे, साक्षीदार फितूर होणे आदी कारणांमुळे खून, खुनाचा प्रयत्न अत्याचार, दरोडा, जबरी चोरी, दुखापत अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटत असल्याचे पहावयास मिळते.

----------------

अपयशाचे खापर साक्षीदारांवर

खुटल्याही खटल्यात साक्षीदार हा महत्त्वाचा दुवा असतो. बहुतांशी खटल्यात साक्षीदार फितूर झाल्याने आरोपी निर्दोष सुटल्याचे जिल्हा न्यायालयातील उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत साक्षीदारांचा विश्वास संपादन करणे, त्यांना कायदेशीर संरक्षण देणे, ते साक्ष बदलणार नाहीत याची दक्षता घेणे ही जबाबदारी पोलिसांचीच असते. मात्र आरोपी निर्दोष सुटल्यानंतर बहुतांशीवेळा साक्षीदारांवर खापर फोडले जाते.

---------------------

राज्यभर गाजलेल्या खून खटल्यातील आरोपी निर्दोष

राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे हत्याप्रकरणातील दहा आरोपींची चार वर्षांपूर्वी पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. तर शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींचीही मार्च २०२१ मध्ये जिल्हा न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली. या दोन्ही खून खटल्यात तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयासमोर सक्षम पुरावे सादर करता आले नाही. ही केवळ दोन उदाहरणे आहेत. अशा स्वरूपाच्या अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटत असल्याचे वास्तव आहे.

------------------------------

वर्षभभरात गुन्हे सिद्धतेची टक्केवारी

खून- ३५

खुनाचा प्रयत्न-२३

विनयभंग-१४

दरोडा-१०

जबरी चोरी-१०

दुखापत-२२