शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई योजनांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2014 01:01 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ टंचाईच्या विविध योजनांना येत्या ३१आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़महसूल दिनानिमित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली़ पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला़ यासह विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत़ सुरुवातीला ३० जुलैपर्यंत याविषयीच्या विविध योजनांना मुदतवाढ दिली होती़ जुलैमध्ये पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र जुलै महिन्यांत पावसाची सरासरी वाढली नाही़ त्यामुळे शासनाने टंचाईबाबतच्या विविध योजनांना येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार उपाययोजना सुरू ठेवल्या जातील़ योजनांचा फेर आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात कुठे टँकरची आवश्यकता आहे आणि कुठे नाही, याविषयीचा अहवाल मागविण्यात आला आहे़ अहवाल प्राप्त झाल्यानंतर टँकरबाबत निर्णय घेतला जाईल़ मात्र जिथे गरज आहे, तिथे टँकर दिले जातील, असे कवडे यावेळी म्हणाले़जिल्ह्यात आतापर्यंत २३ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ पुरेसा पाऊस पडला नाही़ सुदैवाने मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला़ त्यामुळे दोन्ही धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झाली़ मुळा ४६ तर भंडारदरा धरण ६२ टक्के इतके भरले आहे़ त्यात आता पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरला आहे़ त्यामुळे आवक मंदावली असून, आणखी पाऊस होण्याची गरज आहे़ शासनाच्या वतीने पाणीटंचाई असलेल्या गावात ज्या उपाय योजना सुरू आहेत, त्या सुरूच राहतील़ त्यात खंड पडणार नाही, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी) २८१ गावांत टंचाई कायमजिल्ह्यातील २८१ गावे आणि १ हजार ३०१ वाड्या-वस्त्यांना ३४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीदेखील टँकरची संख्या कायम आहे़त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेशमाळीण येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ आपत्ती व्यवस्थापन कक्षातील यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, जिल्ह्यात धोकादायक असलेल्या परिसराची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले आहेत, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़